marathi blog vishva

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ----११
जगतगुरू कोंड देव !
जरा विचार करून पहाल तर इतिहास-तज्ज्ञाशिवाय तुम्हाला पटेल की दादोजी कोंड देव हे शिवाजीचेच काय सगळ्या जगाचेच गुरू आहेत. जगतगुरू !
संभाजी ब्रिगेड पासूनच बघा. ह्यांच्या निडर कार्यकर्त्यांनी मागे जे भांडारकर संस्थेत घुसून शौर्य दाखविले त्याचे खरे श्रेय व प्रेरणा कोणाची ? तर आब दवडणार्‍या आबांची ! राष्ट्रवादीची. कशी ? इतर कोणत्याही सरकारने ह्यांना कोंडले असते तुरुंगात. पण ह्यांचेच कोंड देव ( इतने बडे शहर मे ऐसे हादसे अक्सर होते रहते है--फेम ! ) ह्यांच्याकडे कानाडोळा करते झाले. म्हणजे गुरू झाले कोंडदेव, व तेही दादागिरी करणारे दादोजी !
यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती निमित्त पवार साहेबांनी एक फार मौलिक निरिक्षण नोंदवले की एवढे आयुष्य काढून यशवंतरावांची वैयक्तिक मालमत्ता किती ? तर अवघी, एक दोन लाखाची. जे पवार साहेब म्हणाले नाहीत ते "आणि माझी ?" ते आपण म्हटले तर ? ह्यांच्याही सर्व प्रगतीचे श्रेय कोणाला ? तर कोंड देवांना ! म्हणजे कोण ? तर कुटुंबाची माया, प्रकृती, ह्यांना कोंडते ! शेती परवडत नाही, कर्ज माफी देऊ नये, कांदा अजून महागणार, परदेशात शेती करा असे असंख्य उदगार जे तोंड काढते त्यालाच कोंडणारा हा कोंडदेव रोग ! दर महिन्या दोन महिन्यातून त्याला डागण्या मिळतात !
कुटुंबाची माया ही फार मोठी कोंडणारी देवता आहे. अशोक चव्हाणांना विचारा ! बाकीचे सर्व पचले आणि नेमके नातेवाईकांच्याच आदर्श घरांनी घरघर लावली. इतके करूनही वखवख थांबत नाही. ही थांबवायला एकच देव समर्थ आहे व तो म्हणजे कोंड देव ! त्याला शिवाजी पासून कापून काढला तर आता तो कोणाला का सोडील ?
सर्व विश्व हे एक खेळाचे मैदान आहे व सर्व पैसा-अडका हा एक पोरखेळ आहे असे वाटणार्‍या वैमानिकाचे मनसुबे हवेत झेप घेत असतात. त्याला एकमेव भेव आहे ते कोंडण्याचे, कोंड देवाचे ! तरच तो जमीनीवर येणार !
क्षणात ब्रिगेड बनणारी जात लगेच मागासलेली बनून आरक्षण मागू पाहते, सत्ता काबीज करण्यासाठी इटालियन व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणत म्हणत शेवटी त्यांच्यासमोरच कण्हत कण्हत उभी राहते आणि ह्या सगळ्या नाट्याला भूलून जर जनता ह्यांनाच निवडून देत असेल तर जनतेलाही असेच कोंड देव लखलाभ होतील ! जय जगतगुरू कोंड देव !

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ-----९
सोपी लिकिते !
विकी-लीक्स ने इतके भंडाऊन टाकले आहे की आता "गुपिते"ला पर्यायी शब्दच झाला आहे : "लिकिते" !. मराठीत र्‍हस्व दीर्घाची भानगड ह्या शब्दाला लागू होत नाही. म्हणजे कोणी र्‍हस्व लि व कि वापरले व लिहिले "लिकिते" तर इंग्रजीतले टू लिक म्हणजे चाटणे हा अर्थ धरून हे कोणाचे चाटण आहे ते लोकांनी पहावे. व जर ली व की दीर्घ काढली तर नैतिकता कोणाची लीक होते आहे ते पहावे. आता इतके लीक्स होऊन होऊन सगळा माहोल इतका दल-दलीत झाला आहे की सरळ साध्या गोष्टी आता "सोपी लिकिते" ह्या नावाने प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकी काही वानगी दाखल पहा:
१) राहूल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदू दहशतवाद हा भारताला ज्यास्त धोकादायक आहे का, ह्याची पाहणी सीबीआय ने केली. त्यात त्यांना आढळले: हिंदू दहशतवादी हे फारच बेभरवशाचे आहेत. ते उग्र आंदोलने करतील असे वाटते पण तेव्हा ते करीत नाहीत. राम मंदीर बनवायचे म्हणतात पण बनवत नाहीत. कित्येक ठिकाणी ह्यांचे बॉम्ब फुसके निघतात, फुटतच नाहीत. हे निरनिराळे प्लॅन्सही योजून रद्द करतात. आरएसएस च्या प्रमुखांना मारणार म्हणतात पण कोणीच मारीत नाहीत. आजकाल तर ह्यांच्या संघटना कमालीच्या विचित्र झाल्या आहेत. उदा: गुजरातेत ह्यांच्या पार्टीत मुसलमान निवडून येतात तर हे पार्टीचा प्रवक्ताच मुसलमान ठेवतात. मालेगावच्या प्रकरणातही आढळते आहे की ह्यांनी स्फोटके मुसलमानांकरवी ठेवली. असे जर वाढू लागले तर पुढे चालून भगवा व हिरवा दहशतवाद ओळखू न आल्याने सीबीआयला रंगांधळे व्हावे लागेल.
२) वरील बाबीचा धसका घेऊन सरकारने हिंदूंच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता एक कमिशन नेमले आहे. निवृत्त न्यायाधीश मोहमद रचसा ( हे गृहस्थ "साचर" च्या अगदी विरुद्ध आहेत हा निव्वळ योगायोग समजावा !) सध्या पाहणी करीत आहेत. त्यांचे काही निष्कर्ष : हिंदूंना कधीही आरक्षण नव्हते. त्यामुळे त्यांना सर्वत्र स्पर्धेला तोंड देऊन जगत राहावे लागले. त्यात ते सारखे यशस्वीच होत राहिले. त्याची मुसलमानांना खूप असूया वाटते. तर हा असमतोल घालवण्यासाठी शासकीय नोकर्‍यात हिंदूंना मुसलमानांसारखेच १५ टक्के आरक्षण द्यावे. म्हणजे ते थोडे तरी सुखावतील व आळशी होतील. तसेच सीबीआय च्या पाहणीनुसार सध्या गुन्हेगारात ४० टक्के मुसलमान आढळतात व हिंदू केवळ १० टक्के. तर हाही असमतोल घालवण्यासाठी हिंदूंना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. विशेषत: मोठ्या गुन्हयासाठी. जसे पार्लमेंटवर, मुंबईवर हल्ला करणे. फार तर ह्यात आझमगढी मुसलमान बंधू त्यांचे प्रशिक्षण करू शकतील. त्यांना फाशी-माफी देण्याचा सरकारही विचार करील.
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ---१०

ई-टाली एका हातानेच वाजते !
टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !
बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !
ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !
जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्‍यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !
arunbhalerao67@gmail.com
नारदाची कळ---१०
ई-टाली एका हातानेच वाजते !
टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !
बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !
ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !
जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्‍यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !
arunbhalerao67@gmail.com

रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

नारदाची कळ---९
जेपीसीचे पिसे
रोज लोकसभेत तोच जेपीसीचा गदारोळ पाहून वाटायला लागते की कॉंग्रेस सर्व दोषींना शिक्षा द्यायला तयार आहे, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत सीबीआयची मदत द्यायला तयार आहे, पण जेपीसी मार्फत नाही तर पीएसी मार्फत. आणि त्या पीएसीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी असताना विरोधी पक्षांना जेपीसीच हवी आहे, ती का ?
जेपीसी त सभासद घेताना परत कॉंग्रेसचेच सभासद ज्यास्त असणार आहेत, त्यामुळे निष्कर्ष विरोधात जाईल ही भीती नाहीय. पण सारखे सर्व प्रकरण लोकांसमोर ठळकपणे येत राहणार व त्याने बदनामी होणारच. आता पहिल्याच जेपीसीचे बघा. ही नेमली होती, बोफोर्स घोटाळ्यासंबंधी. काय झाले ? शिक्षा कोणाला झाली ? शस्त्रास्त्रे खरेदीच्या नियमांमध्ये काही सुधारणा झाल्या का ? अजूनही नवनवे संरक्षण खात्यातले घोटाळे होतच आहेत. मग मिळाले काय ? तर राजीव गांधींच्या चारित्र्यावरचा डाग धुतल्या गेलाच नाही. त्याची जबर किंमत चुकवावीच लागली. ह्यालाच सोनियाजी घाबरत असाव्यात.
गंमत म्हणजे अगदी ह्याअगोदरची जेपीसी कमीटी शरद पवारांच्या अध्यक्षतेखालची होती. शीतपेयात घातकी कीटकनाशके आढळली त्याविरोधात. त्याचे काय झाले, ते कोणाला माहीत आहे ? कोणते पाणी शीतपेयवाल्यांनी वापरावे ते सुद्धा नक्की झाले नाही, बंदी तर कोणावरच झाली नाही. हवे ते शीतपेय, तसेच, अजूनही राजरोस मिळते आहे. म्हणजे ह्यापुढे कोणी ए.राजा सारखा भ्रष्टाचार करणार नाही अशी काही व्यवस्था करण्यासाठी जेपीसी हवी असे म्हटले तर खरे आपल्याला सहजी समजू शकेल. मागच्या इतिहासावरून ! ( नाही म्हणायला हर्षद मेहता प्रकरणावरच्या जेपीसी ने शेयर बाजारावर थोडी नियंत्रणे आली हीच एक जमेची बाजू जेपीसीची ! ). जेपीसी द्वारे कोणाला शिक्षा व्हावी, व्यवस्थेत सुधारणा व्हावी ही अपेक्षा अगदी बाळबोधपणाची ठरते. पण सत्ताधार्‍यांना धक्का द्यायला हे हमखास उपयोगी शस्त्र आहे ह्याबाबत दुमत असू नये.
परदेशातले काळे धन परत आणण्यासाठी आपण किती व कसे प्रयत्न केलेत ते सांगतांना प्रणब मुखर्जी नुकत्याच झालेल्या लीडरशिप समिट मध्ये म्हणाले होते की एका देशाने आम्हाला एका माणसाची माहीती दिली व त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकरून वाढीव कर वसूलही केला आहे, पण त्या देशाचे वा माणसाचे आम्ही नाव सांगू शकत नाही. खूप प्रयत्नांचे हे हाल असतात तर जेपीसी वगैरेतून गेलेले पैसे परत मिळणे विसराच !
विरोधी पक्ष व सरकार ठामपणे जेपीसी का हवी वा का नको हे सांगत नाहीत त्यामागे ही कारणे आहेत हे सूज्ञांना मात्र लगेच ध्यानात यावे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

नारदाची कळ---८
आमुचे आम्ही वाया गेलो
परवा जालना येथे नेमाडेंना "कोठारे" पुरस्कार देण्यात येणार होता. पुरस्कार रु.२५ हजारांचाच होता. पण त्यानिमित्त लाख मोलाची गरळ ओकता आली असती, ती तशीच राहिली. हे कोठारे कोण आहेत ? खरे तर आता मराठी साहित्यसंमेलनास माणिकचंद गुटखा वाल्यांनी भरघोस मदत द्यावी, आपल्या गृहमंत्र्यांनी "ऐसे छोटे मोठे हादसे होते रहते है" असे म्हणत गुंडांसोबत पार्ट्या कराव्यात, असा उफराटे वागण्याच्या काळात हे कोठारे कोण हे गैरलागू होते. समजा ते गुटखा बनवणारे उद्योजक असतील तर आपण काही टाटांचे हॉस्पिटल चालवत नाही आहोत ( जिथे बोर्ड लिहिलेले असतात की तुम्हाला गुटखा खाऊन कर्क रोग झाला असेल तर त्यावर इथे उपचार करण्यात येणार नाहीत .). आपली तर साधी साहित्यिक दुकानदारी आहे. त्यात कसली आली आहे साधन-शुचिता !
"आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या लेखकांच्या उथळपणातून व अप्रामाणिकपणातून येतो, हे जर खरे असेल तर आपल्या लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत ?" असे नेमाडे आपल्याला एकेकाळी विचारून गेले आहेत. आता तेच विचारताहेत तर एक वाचक म्हणून त्यांना सांगणे आपले उत्तरदायीत्व ठरते. कारण हा पुरस्कार ही तर नुकतीच सुरुवात आहे. असे किती तरी पुरस्कार त्यांना "हिंदू" वर घ्यायचे बाकी आहे. "सरकारी बक्षीसाच्या चढाओढीत प्रकाशकांचा किती सहभाग असतो हे प्रत्यक्ष क्षेत्रातल्यांना नीट माहीत आहे, काही लेखक तर प्रकाशकांच्या रखेल्याच आहेत" हा सल्ला त्यांना एक तरुण लेखक( नेमाडे, टीकास्वयंवर, पृ.३७) देतो आहे, हे त्यांनाच आता पटणार नाही. पण बोलना बनता है भिडू !
"पारितोषिकांचा साहित्यिकाच्या कसाशी फारसा संबंध नसतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही नोबेल सारखी बक्षिसं असाहित्यिक कारणांवरूनच दिली जातात....अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा , असं मी चांगल्या लेखकांना सांगेन"(टीकास्वयंवर पृ,३८४). असं जर दस्तुरखुद्दांचं म्हणण असेल तर मग नेमाडेंनी गुटखा पुरस्कार स्वीकारावा का ? आता अमेरिकेचे निम्मे भाडे तरी निघेल, हे खरे. शिवाय ज्या "लेखन-बाह्य" राळेमुळे १५ हजार प्रती खपल्या, त्याला अजून थोडी गरळ ओकून हातभार लावता आला असता.
वाचकांच्या दृष्टीने शेवटी (वाचाल तर वाचाल !),सर्व वायाच जाते, तर लेखकाने तरी "आमुचे आम्ही वाया गेलो" का होऊ नये ?
लई भंकस झाली राव, गुटखा तरी काढा, हिंदुराव !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

नारदाची कळ---७

आम्ही Vs तुम्ही

चार्ल्स शूमर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे न्यू यॉर्कचे सेनेटर. त्यांच्या कॉंग्रेस मध्ये ६०० मिलियन डॉलरचे बॉर्डर सेक्युरिटी बिलावर बोलताना ते म्हणाले की जशी सरहद्द महत्वाची तशीच त्या आत होणारी वागणूक महत्वाची. अमेरिकेची ज्यास्त पगाराची कामे काही कंपन्या बाहेरच्या देशात ( जसे: भारत ) देतात, तिथून स्वस्तात माणसे इथे आणतात व कर मात्र अमेरिकन जनता भरत राहते. तर ह्यांची माणसे इथे ज्या व्हिसावर येतात त्याची फी वाढवून २ हजार डॉलर करावी. इथे चोरीच्या गाड्या विकणारी गॅरेजेस असतात ज्यांना हे "चॉप शॉप" म्हणतात व गाडीचे पार्टस खिळखिळे करून मग ते विकतात. शूमरांच्या मते इन्फोसिस कंपनीही असेच एक प्रकारचे चॉप शॉप आहे.
आता ह्यावर भारतीयांना वाईट वाटणे साहजिक तसेच अमेरिकनांना स्वस्त भारतीयांचा राग येणे रास्त. आपल्याकडे नाही का आपण भय्यांना असेच बदडून काढीत. इथे निदान तसे भारतीयांना बदडत नाहीत हा अमेरिकनांचा चांगुलपणाच म्हणायचा.
आपल्या लक्षात येत नाही, पण बाहेरचे लोक येऊन येऊन आता इथे इतके विचित्र चित्र तयार झाले आहे की दर १२ नवीन जन्मणार्‍या बालकात २ बालके बेकायदा आलेल्यांची असतात. आता तर ह्यांना जन्माने नागरिकत्व मिळू नये असे बिल कॉंग्रेस करीत आहे. एरव्ही मॉल्स मध्ये सुद्धा आजकाल गोरी माणसे कमीच दिसतात, ज्यास्त करून मेक्सिकन, भारतीय व काळेच असतात. आपण मुंबईत जसे मराठी टक्का कमी होतोय ह्याची बोंबाबोंब करतो तशीच ह्यांची अमेरिकन टक्का कमी होण्याची ही खळखळ आहे.
मराठी माणसांचे बस्तान चांगले बसले आहे असे वाटावे तोच कळायला लागते की कसले हे मराठी-पण ? ह्यांच्या पोरांना ना मराठी येते ना हिंदी. पसायदान म्हणू लागलो तर नातवंडे म्हणतात "नो मोअर सिंगिंग आजोबा !" असेच अमेरिकनांना वाटते, अरे आमच्या नोकर्‍या तरी ठेवा, आमचे वळण तर चाललेच आहे .
आम्ही Vs तुम्ही असे वाटत असलेला हा तिढा, हळुहळू आम्ही तसेच तुम्ही असा होत चाललेला दिसतोय !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Naardaachi Kal---7

We Vs You

Charles Schumer is a senator from New York and is a democrat. Speaking on the 600 million $ bill for Border Security he opined that companies like Infosis, who are taking away well paying American jobs and giving it to cheap Indians are like "chop shops" ! ( Where stolen cars are dismantled and sold as parts ). And all this is being paid for by Americans through their paying taxes. Hence they feel that fees for legal visa should be increased to 2000 $ per visa to partly recover the taxes.
Well, Indians are bound to feel bad about this because we get cast in a poor light as cheap labourers. And Americans are right within their world as the composition of population is changing very fast. We can only thank Americans that they don't beat us like we beat Bhayyas in Mumbai for being large immigrants there.
Society really changes very fast, while economy keeps us busy looking after each ones of us interests. Because if they count every 12 new born babies, 2 out of them are born to illegal immigrants. Now the American Congress is debating through their proposition whether the by-birth-citizenship should be denied to such illegal immigrants children.
Even during visits to the maals we can notice the changing colours of society when we see less of While families and more of Mexicans and Indians. The Americans' concern about loosing jobs is same as our concern for Marathis loosing jobs and houses in Mumbai.
And are we immigrants happy about this newly aquired prosperity and life ? No, we lament the loosing of our ways of life, all the time.
So, on this issue, what appeared as opening stance of, We Vs they, gets slowly changed to, We and they !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, ३० जुलै, २०१०

नारदाची कळ--६

नीतीचा रंग, रगेलांची अनीती

सध्या अमेरिकेतले एक डेमोक्रॅटिक पक्षाचे वयोवृद्ध कॉंग्रेसमन श्री रेंजल ( स्पेलिंग प्रमाणे आपण यांना रंगेल म्हटले असते पण अमेरिकेत उच्चार स्वातंत्र्य असल्याने ते रेंजल म्हणतात ) चर्चेत आहेत. ८० वर्षांचे हे गृहस्थ न्यूयॉर्कच्या हार्लेम विभागाचे प्रतिनिधित्व करतात. समसमान १० सभासद असलेल्या एथिक्स कमीटीने ( नीती व्यवहाराची कमीटी असते ही किती दिलासा देणारी बाब आहे !) त्यांच्यावर एकूण १३ आरोप ठेवले आहेत. ह्यात मुख्य आहेत, स्वत:च्या नावावर होणार्‍या एका कॉलेजसाठी भरमसाठ देणग्या मिळवणे ( व त्या बदलात देणगीदारांचे कर कमी करून देणे ), अमेरिके बाहेत असलेल्या डोमिनिकन इथे एका बंगल्याची मालकी लपवणे व त्यावरच्या भाड्यापोटीचे कर न भरणे वगैरे. जोडीला काही तांत्रिक उल्लंघने आहेत. जसे : देणग्यांसाठी कॉंग्रेसची लेटरहेडस वगैरे वापरणे. सर्व बाबी पैशात मोजणार्‍या अमेरिकेत हे काही ७,८ मिलियन डॉलरचे प्रकरण तसे काही फार मोठे म्हणता येणार नाही. पण हे अवघड जागेचे दुखणे जरूर आहे. कारण नोव्हेंबरात निवडणूक आहे व ५० वर्षे बिनबोभाट निवडून येणार्‍या रेंजल यांना दोन तीन नवीन उमेदवारांशी लढावे लागणार आहे. शिवाय रेंजल ह्यांच्यावर फार कठोर कारवाई केली तर ते काळे असल्याने काळ्यांचा पाठींबा गमवावा लागणार.

जाणकार म्हणतात की हे प्रकरण तसे दोन वर्षांपासून तपासात आहे. रेंजल ह्यांना शिक्षा कमी करवून घेण्याची व तडजोड करण्याची मुभा आहे, पण त्यांनी ती अजून वापरलेली नसून ते पब्लिक ट्रायल साठी तयार होत आहेत.

हे प्रकरण वाचताना आपल्याकडच्या आरोपांची हमखास आठवण येते. मुळात आपले राजकारणी साळसूदपणे कागदपत्रे हाती लागणार नाहीत ह्याची छान काळजी घेतात . शिवाय कॉलेजेस काढणे हे आपल्याकडे आपण राजकारण्यांसाठीच सोडलेले कुरण असल्याने आपल्याला त्यात गैर वाटतच नाही. आणि आपल्याकडे कोणता राजकारणी सार्वजनिक खटल्यासाठी तयार होईल ?

अमेरिका भले आपल्या राजकारण्यांच्या नीतीचा रंग इथे दाखवत आहे, पण त्यांना शिकायचे असेल तर त्यांना भारतात रगेलांची नीती अगदी स्पष्ट दिसायला मिळेल !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Naradaachi Kal---6

No Angels in Politics, only Rangels

Presently the veteran Congressman of 80 yrs, Mr.Rengel is making news in America. Ethics Committee formed with 4 members each of Democrats & Republicans is investigating charges against him of impropriety and has formally charged him of wrongdoings on 13 counts. This mainly involves solciting huge donations for a college being set up in his name in New York and misusing his office.

This is an embarassment for everybody as Mr.Rangel has been representing Harlem,New York since last 50 yrs in Congress and is due for re-elections in Nov.2010. If a strict punishment is handed to him, it will take away the support of blacks for democrats and if no action is taken against him then Republicans turn holier than thou !

This Rangel episode brings memories of Indian Politicians to our mind. At least credit would have to be given to Indian Roughe politicians that they generally do not leave any paper trails and of course unlike Mr.Rangel they would never face a public trial let alone any Congressional enquiry.

America perhaps can learn a lesson or two from Indian Politicians with their dictum that in politics there are no Angels but only Rangels !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, १ जुलै, २०१०

नारदाची कळ-५
पवारफुल क्रिकेट
आय सी सी आय चे माल्कम स्पीड ह्यांनी आरोप केलाय की पवारांना अध्यक्ष झाल्यावर पूर्ण वेळ मिळणार नाही. कारण ते भारताचे कृषी मंत्री आहेत व १२० कोटी लोकांच्या अन्नधान्न्याची व्यवस्था करण्यापासून त्यांना फुरसत मिळणार नाही. आता आपल्याला माहीत आहे की कृषीमंत्री काही पूर्णवेळ काम करणारे नसतात. आपल्याकडे पाऊसच दोन तीन वर्षांतून एकदा पडतो, शेतकरी इतके गरीब असतात की क्वचितच शेती करू शकतात, शिवाय ती परवडतही नाही. त्यामुळे हा आरोप जाऊ द्या. पण त्यांनी पुढे असे म्हटलेय की पवारांना क्रिकेट मधले कळत नाही. आता मात्र पवारांना क्रिकेट कळते हे दाखवूनच द्यावे लागेल.सोनी वाल्यांनी ( ह्यात सुप्रियांचे भांडवल आहे ) एक कार्यक्रमच ठेवला, "कळतच नकळत कळते ". ह्यातील काही सवाल-जवाब :
सोनी : एकाच वेळी दोन फलंदाज रन-आऊट होऊ शकतात का ?
पवार : कसे शक्य आहे ? आमची परंपराच आहे की एका वेळेस एकच जण "आऊट" होऊन बोलू शकतो. जसे: मी म्हणालो की शेती परवडत नाही, शेतकर्‍यांनी ती सोडून द्यावी की लगेच मॅडमकडून पॅकेजेस येतात. आमचे संपादक म्हणाले की साखरेचे भाव वाढले हे चांगलेच आहे कारण कमी साखर खाल्ल्याने मधुमेह होणार नाही, तर मग मी त्यांना कार्ल्याचा रस प्यायला लावतो.माझ्यावर काही आरोप झाले तर पटेलांना क्लीन चिट्‍ मिळते.किंवा सुप्रियाला.
सोनी : एकदा "रिटायर्ड हर्ट" झालेला फलंदाज परत खेळू शकतो का?
पवार : का नाही ? मी स्वत: किती वेळा तरी परत खेळायला आलेलो आहे. आता आय पी एलचेच पहा. तिकडे भानगडी निघाल्या तरीही इकडे आयसी्सी चे जमलेच की ! आठच एमपी आले तरी दोघा तिघांना घबाड मिळालेच की. कधी मुख्य, कधी संरक्शण, कधी विरोधी, तर कधी कृषी मंत्री ! आता तर लोक म्हणायला लागलेत की क्रिकेटला दुसरे नाव ठेवा : प्वार-खेळ ! खरा अर्थ घ्या : पवार-खेळ ( विरोधक म्हणतील, पोर-खेळ , तर ते खरे नाही !)
सोनी : "फॉलो ऑन" म्हणजे काय ?
पवार : हा आमचा आदेश आहे. सगळ्या सग्या सोयर्‍यांना व जणतेला. आमच्या मागे या, कारण यातच आमचे भले आहे !
अर‍र बदलला का चॅनल !

-----अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, ८ जून, २०१०

नारदाची कळ-४
लप फायनान्स, लपा लपा, लपलप !
कोणीही उठावे व शरद पवारांना टपली मारून जावे ! आणि कार आश्चर्य, ते खरेच निघते ! आता आयपीएलचेच पहा ! टाईम्सने जनरल वाईड बॉल टाकला की सिटी कॉर्पोरेशन मध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि काय योगायोग लॅप फाइनान्स ह्या कंपनी मार्फत त्यांचा सहभाग आहे हे खरेच निघाले. आता कळते आहे की ही लॅप फाइनान्स कंपनी खरे तर आहे "लप फाइनान्स". लपालपीच्या खेळात आपण जसे लपतो व ज्याच्यावर राज्य असेल तो आपल्याला शोधतो तसे कुठलीही गुंतवणूक लपवायची असेल तर ही "लप फाइनान्स" कंपनी ती गुंतवणूक बेमालूम लपवते. मुळात भारतीय असलेल्या ह्या लपालपीच्या खेळालाच शरद पवारांनी त्याचे नामाभिधान "आय पी एल" करून ( लपालपीचेच हे भाषांतर आहे असे सकाळचे पवार, शरद पवारांना रात्री सांगत असताना खूप जणांनी ऐकले आहे असे कळते !) प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे हे मात्र लोक विसरतात.
लपालपा, लपलप, साहेब जात आहेत !
-----अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, २१ मे, २०१०

नारदाची कळ-३
३-जी चे जी जी र जी जी !

नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञान म्हणजे जी, प्रथम होते २-जी, आणि आता आले आहे ३-जी ! सरकारची अपेक्षा होती तीस हजार कोटीच्या आसपास. लिलावात मिळाले ६७ हजार कोटी !

एवढे पैसे मिळवून देणारे हे मोबाईलचे तंत्रज्ञान देईल इंटरनेट, टी.व्ही., कॉन्फरन्स व्हिडीओ कॉल्स, वगैरे. त्यासाठी हॅंडसेटस वेगळे (महागडे , १६/१७ हजाराचे ) लागतील. आता लोक विचारताहेत की एव्हढे महागडे तंत्रज्ञान आपल्याला परवडणार आहे का ? आणि हे विचारणारे आपले लोक आधीच मर्सीडीज, बीएमडब्ल्यू , ऑडी अशा प्रचंड महागड्या गाड्या घेऊन बसले आहेत.
हे आहे प्रचंड किंमतीच्या भूखंडांसारखे ! बिल्डरांना जसे कितीही महागडा प्लॉट परवडतोच ( कारण त्यावर फ्लॅटस् बांधून ते आपल्याकडनंच पैसे घेणार असतात ). कितीही किंमत कशी परवडते ? कारण कारपेट, बिल्ट अप, सुपर बिल्ट अप, असा घोळ कोणी मोजत बसत नाही . तसेच असते मोबाईलचे !

जी कंपनी मोबाईलचे बिलिंग करते त्यांना ते कोष्टकच लिहून देतात की १ मिनिट म्हणजे ४३ सेकंद ! आणि आता तर त्यांनी आपल्या गळी दर सेकंदा वर बिलिंग करण्याचे उतरवले आहे. आता आपण आपला सेकंद व त्यांचा सेकंद पडताळून पाहणार आहोत का ? व कसे ?

तुम्हाला हे कपोल कल्पित वाटत असेल तर इंटरनेट सेवा पुरवणार्‍या एम् टी एन एल च्या बिलिंग सेवेला भेट द्या. ते म्हणतात तुम्ही नुसते साइटवर गेलात तरी ते "डाऊन लोड" धरल्या जाते, अनलिमिटेड डाऊनलोड म्हणजे केंव्हांही डाऊनलोड, असे सर्रास लूटमारीचे कोष्टक ! असेच आहे टोल चे ! किती टोल वसूल झाला व किती खर्च झाला होता ह्याचा हिशोबच नसतो. आपण तर ते विचारीतही नाही. म्हणूनच तर नुसतेच भरभक्कम लिलाव नाही तर "राजा" ला भरपूर मलिदा देणेही परवडते. कारण ते परवडणे आपणच आपल्या खिशातून भरत असणार असतो !

-----अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०

नारदाची कळ : २
क्लीन चीट !
आजकाल सगळेच राजकारणी खेळ-क्षेत्रात का आहेत ?
हे सगळे विश्व म्हणजे एक ब्रह्मचैतन्य आहे. आणि चैतन्याचा पाया आहे, क्रीडा. म्हणून ज्यांना चैतन्यमय राहायचे आहे त्यांना कुठलाना कुठला खेळ आवश्यक आहे. अगदी स्वत:च खेळले पाहिजे असे नाही. सहभाग आणि स्वाहम केले तरी चालते. शिवाय नाही तरी राजकारण खेळापासून फार वेगळे नाहीय. जसे: क्रिकेट हा खेळ तर राजकारण हा पोरखेळ !
साहेबांनी मोदींना ( दोन्ही मोदी ) क्लीन चिट का दिली ?
हे काय विचारणे झाले ! फारच बुवा तुमचे अज्ञान ! साहेब स्वत:च नाही का क्लीन चीट !
----कळलाव्या

मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

नारदाची कळ
भारतीय वृत्तपत्रे भाषा नीट छापण्याच्या कामात फारच चुका करतात. आता हेच पहा ना ! बिचारे शशी थरूर . यूनो च्या सेक्रेटरी पदासाठी निवडणूक लढलेला हा थोर माणूस.( आता निवडून नाही आला हे यूनोचे कमनशीब.). त्याच्या तिसर्‍या मैत्रिणी संबंधी सगळे पत्रकार खार खाऊन आहेत. सानिया सारख्या एका सुंदर मुलीचे लग्न होते न होते तोच आता ही कोण सुनंदा पुष्कर आहे तीही लग्न करते आहे. सुंदर मुलींचे कितवे लग्न हा कधी प्रश्नच नसतो. वाईट असते ते त्यांना इतरांनी फितविणे. ह्याच जेलसी-न्यायाने ही घटनाच भारतीय पुरुषांना डिप्रेशन आणणारी. त्यात भारतीय पत्रकारांनी इतकी ढोबळ चूक करावी ! ही सुनंदा पुष्कर आता शशी थरूर ह्यांची मैत्रीण आहे व ते तिसरे लग्न करणार आहेत हे किती चूक आहे. पुष्कर मैत्रिण नसून खर्‍या बातमीत "पुष्कळ मैत्रिणी आहेत" अशी ओळ होती. त्याची मुद्रणात चूक करीत सुनंदा पुष्कर ही एकच मैत्रीण आहे हा समज पसरविणे हे थरूर साहेबांचे बदनामी करणारेच आहे. आता ते नक्कीच अब्रू-नुकसानीचा दावा ठोकणार पत्रकारांवर. रहा आता तयार किंवा माफीनामा छापा की खूप सुंदर मैत्रिणी आहेत थरूर साहेबांना !
-------कळलाव्या