tag:blogger.com,1999:blog-67483962640316593892024-03-07T23:06:45.173-08:00naaradaachi-kalthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-58859950482488620222012-03-03T22:23:00.000-08:002012-03-03T22:23:23.033-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-RtoBVpbi2Cw/T1MJ1Q8JPbI/AAAAAAAAAcE/CWWUI_Ut6D8/s1600/happy-holi-wallpapers8.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="http://4.bp.blogspot.com/-RtoBVpbi2Cw/T1MJ1Q8JPbI/AAAAAAAAAcE/CWWUI_Ut6D8/s320/happy-holi-wallpapers8.jpg" width="320" /></a></div>
<br />
<span style="font-size: large;"><span style="color: blue;">होळीच्या नव्या बोंबा !<br />१) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> यूपीच्या खेळीत, राहूल दाढी चोळी !<br />२) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> सोनियाच्या साडीवर, मायाची चोळी !<br />३) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> राहूलच्या झोळीत, मुसलमान लोळी !<br />४) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> राहूलच्या यूपीत, मेली जनता भोळी !<br />५) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> फाटली फाटली, कृपाची झोळी !<br />६) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> कृपाच्या दांडीवर, कॉंग्रेसची चोळी !<br />७) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> नाशिकची द्राक्षे, आंबट झाली !<br />८) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> साहेबांच्या गाली, हाताची टाळी !<br />९) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> पृथ्वीच्या जबड्यात, आदर्शाची जाळी !<br />१०) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> अण्णांची कढी, झाली शिळी !<br />११) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> सिबलची तिब्बल, लीलावात बोली !<br />१२) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> राहूलच्या यूपीत, सग्ळे हात चोळी !<br />१३) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> यूपीच्या गाडीत, मुलायम हात चोळी !<br />१४) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> राहूलच्या गाडीत, सग्ळ्यांची मोळी !<br />१५) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> कृपाच्या गाडीत, सडकी केळी !<br />१६) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> कोर्टाच्या पंचपात्रात, कृपाची पळी !<br />१७) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> राणेच्या गाडीत, न्युक्लिअर केळी !<br />१८) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> कॉंग्रेसच्या राज्यात, बंदुकीची गोळी !<br />१९) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> कॉंग्रेसच्या हाती, पैसा घोळी !<br />२०) होळी रे होळी, पुरणाची पोळी !<br /> आव्हाडाच्या कवाडी, कडीची पाळी !<br /><br /> </span></span></div>the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-37238858002178680732012-02-16T23:00:00.001-08:002012-02-16T23:00:57.567-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-_Ehjv2cwTC8/Tz37CXddg2I/AAAAAAAAAbo/wLtYM_KMrRs/s1600/Rahul-tearing.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-_Ehjv2cwTC8/Tz37CXddg2I/AAAAAAAAAbo/wLtYM_KMrRs/s1600/Rahul-tearing.jpg" /></a></div>
<br />
<br />
नारदाची कळ----२१<br />राहूल काय फाडतोय !<br /> ह्या निवडणुकीच्या प्रचारसभात प्रियांका अगदी तोडतीय. आणि सुंदर तर काय दिसतीय ! ती तोडतीय, तर राहूल फाडतोय ! सोनियाला अगदी धन्य वाटावे असेच हे चित्र आहे. आपण आपल्या देशाला भारत-माता म्हणतो ते सार्थच वाटावे असे देखावे आजकाल पहायला मिळताहेत. स्टेज वर सोनिया-माता बसली आहे. बाजूला प्रियांका आहे. ती अगदी इंदिराजींसारखीच दिसते आहे. त्यांचीच हेअरस्टाईल. स्टेजवर आरामात पहा तीन तीन पिढया ! त्यात परत ती इतकी खेळकर आहे की आपल्या मुलांना धक्का मारते, आईचे गालगुच्चे घेते. सोनिया मातेचा संसार पहा कसा देशाच्या संसारात एकरूप झाला आहे. जणु काही जिवतीचेच चित्र स्टेजवर रेखाटलेले असे. आपल्या बाळांचे हे प्रताप पाहून आता सोनियांना नि:श्चिंतपणे केमोला जायला हरकत नाही !<br /> राहूलची तडफ व दाढी तर काय छान दिसते आहे ! दाढी सुद्धा अशी दाट की कोणालाही त्याच्या मर्दानगीची झलक साक्षात दिसावी. आणि आजकाल तो भाषणही काय जोशात देतो आहे. लोकसभेत कसे लिहिलेलेच वाचावे लागते. आता निवडणुकीत तो अगदी त्वेषाने बोलतो आहे. तोंडपाठ भाषण. परवा तर त्याने कमालच केली. म्हणाला मुलायम-सिंग, मायावती व भाजप ह्यांनी काय नुसती आश्वासनेच दिली आहेत. काय आहेत ही आश्वासने ? असे विचारत राहूल एक चिठ्ठी काढतो. ती वाचत म्हणतो, बिजली देंगे, नोकरी देंगे, बेरोजगारी-भत्ता देंगे वगैरे. असली नुसती आश्वासने काय कामाची ? आणी त्वेषाने राहूल ती चिठ्ठी फाडून, तुकडे तिथेच समोर फेकतो.<br /> त्या दिवशीचे हे त्वेषाचे भाषण झाल्याबरोबर बिचार्या राहूलवर एक वेगळाच प्रसंग गुदरला. त्याला रात्री एक सायबर कॅफे हुडकून "शादी.कॉम" वर लॉग-इन करावे लागले. कारण सोनियाजींनी राहूलसाठी त्यावरून एक शॉर्ट-लिस्ट तयार केली होती व गुप्त हेरांकरवी ती राहूलला स्टेजवरच पोचती केली होती. त्यात सहा मुलींची नावे, ई-मेल व पासवर्डस् दिलेले होते. आता ह्याने त्वेषाच्या आवेशात नेमकी तीच शॉर्ट-लिस्ट फाडली. आता त्या मुलींची हा डेट कशी घेणार व निवडणूक झाल्यावर परदेशी त्यांना कसा भेटायला जाणार ? सॉरी, सॉरी....आता ती शॉर्ट-लिस्ट शादी.कॉम वरूनच काढायला पाहिजे ! त्यासाठीच तर राहूल शोधतोय सायबर-कॅफे !<br /><br />------------------------------------------<br />अरुण अनंत भालेराव<br />-----------------------------------------------------------------<br /><br /> </div>the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-64030025111950274682011-12-01T01:09:00.001-08:002011-12-01T01:11:00.660-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-Nyi8RSn3Fxs/TtdEiCGPNkI/AAAAAAAAAZw/Ng4uSvAsT0I/s1600/Wallmart.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-Nyi8RSn3Fxs/TtdEiCGPNkI/AAAAAAAAAZw/Ng4uSvAsT0I/s1600/Wallmart.jpg" /></a></div>
---------------------------------------------------------------------------<br />नारदाची कळ---१९<br />एफ डी आय----फाईन्ड डॉलर्स इन इन्डिया<br /> राजकारण कोणी जनसेवेसाठी करीत नसते. राजकारण असते पैसे कमावण्यासाठी. म्हणूनच तर एक निवडणूक लढवायची तर आजकाल दहा बारा कोटी तरी लागतातच. राजकारणी जेव्हा लाचलुचपतीत पकडल्या जातात तेव्हा कमीत कमी दहा बारा हजार कोटी रुपयांची तरी अफरातफर असावी लागते. आजकालचे ते प्रमाणच झाले आहे. २-जी घोटाळा एक लाख कोटींचा. फुटकळ आजकाल कोणी खातच नाही. <br /> असे असताना फुटकळ व्यापारात सरकार दरबारचे एवढे का म्हणून लक्ष गेले असावे ? वॉलमार्ट ५१ टक्के गुंतवणूक घेऊन येईल, तेव्हा ४९ टक्के गुंतवणूक तर इथल्यांचीच लागेल ना ? त्यांच्याशी जे हातमिळवणी करतील त्यांना मग नफाच नफा मिळणारा आहे. आता त्यांच्याशी जे कोलॅबोरेशन करणार ते कोण असणार आहेत. ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा मुबलक आहे अशाच कंपन्या आणि मोठे लोक. राजकारण्यांकडे जर काही हजार कोटी असतील तर ते कुठे गुंतवतील ? वॉलमार्ट चांगला धंदा आहे की ! त्यात आरामात गुंतवता येतील. नुसते वॉलमार्ट येणार म्हटले की इथल्या रिटेल कंपन्यांचे शेअर्स लगेच एका दिवसात १७ टक्क्यांनी वाढले त्यावरून वारे कोणत्या दिशेने वाहते आहे ते कोणालाही कळावे.<br /> २-जी घोटाळ्यात बलवाने कनीमोळीच्या कंपनीला २०० कोटी रुपये बिनतारणाचे कर्ज दिले होते. आता हे पैसे त्यांनी परत केले असे दाखवले तरी २०० कोटी रुपये कोणाकडे तरी ज्यादा झालेले फिरत आहेत हे तर नक्कीच. सोनिया गांधींचा जावई, वढेरा, ह्यांना दिल्लीची एक बांधकाम व्यवसायातली कंपनी, डीएलएफ, २५ कोटी रुपये बिनतारणाचे कर्जाऊ देते, हे पाहिल्यावर त्यांच्याकडे निश्चितच असे अजून कित्येक हजार कोटी रुपये जमा झालेले असतील. ते कुठे बरे गुंतवणार ? त्यांना वॉलमार्ट चांगलेच की ! कदाचित डॉलरमध्येही त्याचा लाभ घेता येईल. <br /> एवढे हे प्रकरण महत्वाचे असताना, लोकसभा चालली काय अन् न चालली काय ? आठ दहा दिवसात काही तरी मार्ग निघेल किंवा फार फार न्युक्लियर बिलासारखा काही मतांचा खर्च करावा लागेल. पण गुंतवणुकीची इतकी चांगली संधी राजकारणी कशाला सोडतील ? काही काळजी करू नका, सर्वांची नीट व्यवस्था लागेल !<br /><br />--------------------------------------------------------<br />अरुण अनंत भालेराव<br />-------------------------------------------------------------------<br /><br /></div>the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-80760103526793156002011-09-08T23:09:00.001-07:002011-09-08T23:09:44.211-07:00सामूहिक लोकपाल उत्सव !<br />---------------------------------------------<br /> लोकमान्य अण्णा हजारेंनी सामूहिक लोकपाल उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सिव्हिल सोसायटीचा जन-लोकपाल पाहून भारताच्या लोकसभेनेही लोकपाल बसवण्याचे ठरवले. आता विरोधी पक्षाला अगदी ५२ फुटी उंचीचा लोकपाल हवा होता, तेव्हा त्यांनी उंची तोलून धरणारा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचाच लोकपाल बसवायचे ठरवले. विरोधी पक्षाचा ह्यात डाव असा होता की प्लॅस्टर ऑफ पॅरीस मुळे हव्या त्या साचात लोकपालाला घडवता येईल. कॉंग्रेसला मात्र पर्यावरण-मैत्रीचा, मातीचा, लोकपाल हवा होता. त्यांच्या मते तो इथल्या मातीचाच असल्याने लवकर विरघळेल. शिवाय सर्वांचेच पाय मातीचेच असल्याने, लोकपालही मातीचाच असलेला बरा. एक हूल म्हणून राहूल म्हणाला खरा की लोकपालाचे आपण एक कायमचे स्वतंत्र पीठच स्थापू. पण ते नंतरचे ! ( विरोधी पक्षाला एरव्ही सोनियांचे परकीयपण खुपते पण लोकपाल मात्र त्यांना पॅरीसच्या मातीचा का हवा ? ). अण्णांचा लोकपाल उजव्या सोंडेचा असेल तर इतरांचा डाव्या सोंडेचा ! श्रीमती अरुणा रॉय ह्यांना मात्र सगळ्यांचा मिळून केलेला लोकपाल, झाला तर, पाहिजे होता. आता सगळ्यांचा मिळून लोकपाल कसा असेल ? ---पोट विशाल व सैलसे असावे म्हणून लवचिकतेचे, रबराचे असावे, हात लंबे असावेत ( कनून के हात लंबे होते है ना ? ), ह्रदय कणखर लोखंडाचे असावे व पाय मातीचे असावेत, असे सामूहिकपणे लोकपालाचे रूप ठरले.<br /> लोकपालाला जनजागृतीच्या क्रांतीच्या, लाल रंगाचे, फार महत्व असल्याने गणपतीप्रमाणेच ह्याला लाल रंगाची फुले वहावीत असे ठरले. गणपतीला जशा दुर्वा प्रिय असतात तशा लोकपालाला कॉंग्रेस गवताच्या दुर्वा चढवाव्यात असा प्रस्ताव ठेवण्यात आला. लोकपालाचे वाहन म्हणून ( गणपतीचा जसा उंदीर ) टोपी परिधान केलेले अण्णा नियुक्त करण्यात आले. रूढी अशी की लोकपाला जवळ जाण्याआधी लोकांनी बाहेर बसवलेल्या अण्णांच्या कानात हळूच आरोप पुटपुटावेत. जसे गणपतीच्या दर्शनार्थ आलेले भक्त आपली करुणा उंदीराच्या कानात सांगतात व ती गणपतीला पोचते तशीच ही व्यवस्था असेल. उदाहरणार्थ; तक्रारपती अण्णांच्या कानात पुटपुटू शकतील.." अण्णा, शरदजींचे लवासामध्ये इतके झाले आहेत आता !..". किंवा "अण्णाजी, सोनियाजींचा बदललेला स्विस नंबर आहे एकदोनतीनचार...". <br /> प्रत्येक जण लोकपाल आपापल्या सोयीनुसार बसवू शकतील. बहुदा कॉंग्रेस-वाले दीड दिवसाचा ठेवतील, तर भाजप-वाले पूर्ण बारा दिवसांचा. लोकपालांच्या आरती नंतर खिरापत आपापसात वाटून घेण्याची गणपतीची प्रथा इथेही चालू ठेवावी लागेल. राज्याराज्यात छोटे लोकपाल म्हणजे लोकायुक्त बसवावेत. हे छोटे लोकपाल पालीकेच्या हौदात विसर्जित होतील, तर मोठे जन-लोकपाल भव्य अशा सागरात ( जन-सागरात ) विसर्जित होतील. लोकपालाबरोबर गौरी बसवायच्या असतील तर किरण बेदी-मेधा पाटकर, मायावती-ममता, वा अरुणा रॉय-सोनीया अशा ज्येष्ठा-कनिष्ठा जोड्या बसवता येतील. रोज लोकपालाची खाली दिलेली आरती करण्यात येईल व टेबलाखालून सर्वांना खिरापत वाटण्यात येईल. <br /> कुठल्याही सामूहिक दैवताच्या आख्यायिका असाव्या लागतात तरच ती दैवते चांगली फोफावतात असे आढळून आल्याने, सामूहिक लोकपालाच्या खालील आख्यायिका अधिकृत समजल्या जातील : <br />१) एकदा सर्व लोकपाल शर्यत लावतात. प्रत्येक लोकपालाकडे एक सरकारचा घडा दिलेला असतो. त्यात त्याने एक भ्रष्टाचाराचा अपराध झाला की एक खडा टाकायचा. ज्याचा घडा लवकर भरेल व जो जगाला तीन प्रदक्षिणाही घालील तो लोकपाल विजयी घोषित करण्यात येईल. अण्णांचा जनलोकपाल खूप हुशार असतो. तो गुपचूप महाराष्ट्रात येतो, रस्त्यावरची उखडलेली खडी घडयात टाकतो व राळेगणसिद्धीला तीन प्रदक्षिणा घालतो. त्यालाच विजयी घोषित करतात. कारण राळेगणसिद्धी हेच त्याचे जग असते !<br />२) एकदा न्हाणीघरात सोनियाजी न्हात असतात. ( हिंदी व्हर्शन: एक बार सोनियाजी भारतकी गंगा न्हा रहे थे ! ). बाहेर रखवालीला त्या आपल्या विश्वासातल्या मनमोहनाला बसवतात. ( राहूल अजून तयार झालेला नसतो ). तेव्हढ्यात तिकडून एक "जनता" येतो. ( अरे, ये जनताही खरी मालिक है, ये तो उसके सेवक है !--- इति रामलीलावरचे अण्णा .). तो म्हणतो मला बाईंना भेटायचेय. मनमोहन मना करतो. "जनता"ला राग येतो. तो मनमोहनाशी लढतो. त्यात मनमोहनाचे डोके उडते. तेव्हढ्यात बाई बाहेर येतात व "जनता"ला म्हणतात, अरे हा तर आपलाच मनमोहन होता ना ! आता तर हा डोक्यानेच गेला. ह्याची पगडी आता कशी बांधायची ? सिर सलामत रहता तो पगडी पचास ना ! मग "जनता" म्हणते काही काळजी नको, आपल्या कडे भरपूर पांढरे हत्ती पाळलेले आहेत. त्यांच्याच एकाचे सिर लावू यात. तर तसे केल्यावर मनमोहनाचा लोकपाल तयार होतो व तोच सध्या आपल्यावर देखरेख करीत आहे बरे ! <br /> गणपतीला जसे मोदक प्रिय असतात, तसे लोकपालाला मिडीया-बाईटस् प्रिय असून त्यांचे किमान २१ चॅनेल्स वरचे बाईटस् लोकांना वाटावे लागतील. सामूहिक गणपतीच्या जशा आरोळ्या असतात तशा लोकपालांच्याही गर्जना असतील : <br />एक दोन तीन चार , सगळीकडे भ्रष्टाचार !; <br />किंवा एक दोन तीन चार, लोकपालांचे भय भय फार ! ;, <br />किंवा लोकपाल गेले कमीटीला ( स्टॅंडिंग कमीटीला ), चैन पडेना आम्हाला ! ;, <br />लोकपाल म्होरं या, पुढच्या वर्षी लौकर या ! ;, <br />किंवा लोकपाल गप्पा--थोर या ! ;, <br />किंवा लोकपाल गप्पा--बोर या ! ;, <br />लोकपाल गप्पा--घोर या ! ;. <br />सामूहिक लोकपाल उत्सवात ( अण्णा जसे "भारत माता की जय" असे आवाहन करतात तसेच, पण इस्लामप्रमाणे देशाला वा आईला देवाचा दर्जा नामंजूर असल्याने ) निधर्मी घोषणा असेल : <br />"भारत खाता ही-- हय !" किंवा "भारत जिताही--- नय !" किंवा "भारत खाता भी-- लय !" किंवा "भारत की नीती भी-- गय !"<br /><br />-----------------------------------------------------------------------------------------------<br />अरुण अनंत भालेराव<br />---------------------------------------------------------------------------------------<br />लोकपालाची आरती:<br />नोकरशहांना, खासदारांनो, वार्ता विघ्नाची<br />नुरवी पुरवी ऐट लोकपालाची<br />सर्वांगी सुदूर अटी भ्रष्टाचाराची<br />कंठी आवळे फास कारवाईची<br />जयदेव जयदेव जय लोकपाला, दर्शन मात्रे जन धन्य हो झाला<br /><br />जय देव जय देव जय लोकपाला<br />तुमच्याच्याने देश स्वच्छ हो झाला<br />जय देव जय देव ... ||<br />तुमच्या फटक्याने घाबरले सारे<br />सांगती एकमेका सावध व्हा सारे<br />काळ्या पैशाने हो पोबारा केला<br />जय देव जय देव... ||<br />लोकपाल वंदूया लोकपाल भजूया <br />विसर्जनाची वाट पाहूया<br />संपले दहा दिवस खाऊया चला<br />जय देव जय देव ... ||the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-26575570954558348632011-07-16T04:18:00.000-07:002011-07-16T04:19:04.912-07:00------------------------------------------------------------------------------------<br /><br />नारदाची कळ----१८<br />राहूल गांधी : "सरकार सगळे आतंकवादी हल्ले रोखू शकत नाही, ९९ टक्के रोखू शकते पण १ टक्का हल्ला होऊ शकतो !"<br /> श्रीमती सोनिया गांधी ह्या राहूल गांधीच्या जन्मावेळीच्या बाळंतपणात जरा अवघडल्या होत्या. एका व्हायरसने त्या खूपच आजारी पडल्या होत्या. त्या दरम्यान आलेल्या तापामुळे बाळ राहूलला इजा होणार होती. ताप जर लवकर कमी झाला नाही तर बाळावर परिणाम होऊन ते मेंटली रिटार्डेड निघण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी सगळ्या देशोदेशीच्या तज्ज्ञांना बोलावले होते. एका इटालियन डॉक्टरकडे एक औषध होते खरे, पण अजून त्याच्या सर्व तपासण्या झालेल्या नव्हत्या. औषधाला अजून मंजूरी मिळालेली नव्हती . पण दुसरा काहीच इलाज नव्हता . बरीच खलबते झाली. शेवटी श्रीमती सोनिया गांधींना पूर्ण कल्पना देऊन ते औषध द्यावे असे ठरले. त्यांनी विचारले ह्यात धोका काय आहे ? डॉक्टर सांगू लागले ९९ टक्के केसेस मध्ये मेंटल रिटार्डेशन रोखण्यात यश येऊ शकेल, फक्त एक टक्का केस मध्ये....सोनिया गांधींना इतके दुखत होते की त्या म्हणाल्या...हरकत नाही...द्या एकदाचे लवकर...आणि यथावकाश त्या बाळंत झाल्या . बाकी सर्व ठीक होते पण बाळाची बुद्धीची वाढ होत नव्हती. त्यावर सोनिया ( व राजीव व इंदिरा ) म्हणाल्या काही हरकत नाही....ह्या १ टक्केवाल्याला मी भारतात वाढवीन व पायलट नाही तर नाही, पंतप्रधान तरी करीनच !<br /> हा किस्सा ऐकल्यावर लगेच मनमोहनसिंगांची इतिहासकार मुलगी शोध घेऊ लागली की मनमोहनसिंग ह्यांचा जन्म कुठे झाला होता, डॉक्टर कोण होते, व ते औषध दिले होते का ? <br /><br />---------------------------------------------------------------------------the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-27415052716253540572011-06-03T21:13:00.000-07:002011-06-03T21:17:18.127-07:00नारदाची कळ---१६<br />स्वर्ग का नरक ?<br /> <br />आजकाल एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. स्वर्ग व नरक हे खरेच आहेत की नाहीत ? ह्यावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे शास्त्रीय निर्वाळा देतात की असे काही नसते. ह्याच विषयावर श्री.गिरिश कुबेर ह्यांनी लोकसत्तेत आजच एक लेख लिहिलेला आहे. त्यांचा "अन्यथा"सदरातला स्टीफन हॉकिंगवरचा लेख छानच आहे. पण मुळात कोणताच विचार काळे-गोरे ह्या काटेकोर रंग-परीघात बसणारा असत नाही . म्हणूनच तर गल्लतीची शक्यता कायम राहते . <br /> ज्या स्टीफन हॉकिंगचे आपण गोडवे गातो त्याच्या, फार लोकांना माहीत नसलेल्या काही बाबी, त्याच्या बुद्धिमत्तेच्या प्रगल्भतेनंतर, जरा काळजीने पहा. ह्याची बायको इंग्रजीची प्राध्यापिका. तीन मुले व स्टीफन ह्यांचे आदर्श संगोपन करीत असताना, ह्या स्टीफन महाशयांनी ज्या विद्यार्थ्याने ह्यांच्या खुर्चीवर बोलण्याचा संगणक बसवून दिला होता, त्याच्याच बायकोबरोबर ( ही नर्स होती ) संधान जुळवले. एव्हढा गलितगात्र असतानाही, पहिलीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्नही केले. तरीही त्यांचे चाळे शमले नाही. एकदा हा घरात मार लागून पडलेला आढळला, एका विद्यार्थ्याने पोलिसात नेले तर बायकोने ठिकठिकाणी ओरखडे काढलेले. ज्या विकलांग शरीरात इतकी प्रगल्भ बुद्धी वसते आहे, त्याच, एकही स्नायू काम न करणार्या शरीराने, त्याला इतके पछाडावे ? ह्या एकाच प्रमादापायी कोणाही चित्रगुप्ताने स्वर्गाची दारे ह्याला बंद करावीत असेच हे वागणे आहे. शास्त्रज्ञाच्या शिक्कामोर्तबाने आता ह्याने म्हणावे की स्वर्ग किंवा नरक असे काही नसते, तर ते शास्त्रीय किती व मानस-शास्त्रीय किती हे कळणे अवघड आहे.<br /> आपला असा समज दिसतो की माणसाच्या ज्या नैसर्गिक उर्मी असतात त्या रास्तच असतात. पण जरा विचार केलात तर दिसेल की ह्या उर्मींना माणसाला कायम एका शिस्तीच्या स्वाध्यायाने पारखून घ्यावे लागलेले आहे. नर-मांस-भक्षणाचे उदाहरण घ्या. प्रथम आदिमानव नरमांसभक्षण करीत असे. त्या उर्मीला कठोर नीती-नियम लावून जेव्हा त्याने हजारो वर्षे स्वत:लाच पटवले, तेव्हाच ही उर्मी आताशी लोप पावत आली आहे. ही कठोर स्वाध्यायाची शिस्त बाळगणे ही स्वर्गाची एक प्रकारची हमीच म्हणायला हवी. मातागमन, बहिणीशी संग ह्या उर्मी ( जर कुणाला आल्याच तर ) शिस्तीने निकामी करण्यासाठीच कुठलाही समाज, आई-बहिणीवरच्या शिव्या निर्माण करत असतो. व तरीही तुम्ही त्या उर्मींबरोबर वाहवलात तर ते नर्कात पडल्यासारखेच आहे असे आपण समजतो. स्वर्ग वा नरक ह्या कल्पना ह्या शिस्तीसाठी आवश्यकच असतात, कुठल्याही धर्मात . तुमच्याच कार्यक्षेत्रातले उदाहरण घ्यायचे तर आजही अशी वर्तमानपत्रे आहेत ज्यात अग्रलेख चार ठिकाणी चार तुकड्यात दिलेला असतो. तुमच्यासारख्यांची शिस्तच मग व्यवस्थित अग्रलेखाला त्या वर्तमानपत्राला नरकातून काढते . स्वर्ग करते.<br /> साहित्यात कविता हा प्रकार सहज स्फूर्तीचा आपण मानतो, व म्हणूनच न जाणो ह्या सहज-स्फूर्तीमुळे ह्या साहित्यप्रकारात काही गहिरे सत्य, मूल्य, असावे असे समजून त्याला चांगलाच मान देतो. पण कुठल्याही कवीला, भाषेच्या शिस्तीतून ( शब्द, अर्थ, वृत्त वगैरे ) ह्या स्फूर्तीला न्यावेच लागते. असे नेताना जर त्याने कधी "झपूर्झा" असा कधी न ऐकलेला शब्द वापरला असेल तर मग टीप द्यावी लागते की हा शब्द म्हणताना पोरी झिम्मा खेळताना जो आवाज होतो ( झिम पोरी झिम सारखा ) तसाच आवाज होतो. मानवी स्फूर्तींना शिस्तीचा, विवेकाचा, तारतम्याचा चाप प्रत्येक प्रबुद्ध समाजाला लावावाच लागतो व तेव्हाच तो स्वर्ग होतो. मग भले असा स्वर्ग स्टीफन हॉकिंग म्हणतात तसा अस्तित्वात असो वा नसो.<br /> आपल्याकडे काश्मीरच्या सौंदर्याची वाखाणणी करताना म्हणतात की पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ( अमीनोस्तु अमीनोस्तु अमीनोस्तु ). ह्याच काश्मीरात परवा दल लेकवरचा एक काश्मीरी सांगत होता की, खरे तर आमच्या श्रीनगर चे आधीचे नाव श्री-नरक असले पाहिजे ! माणसांचा जसा कायम नरकाचा स्वर्ग करण्याचा चंग असतो तसा कधी कधी ( किंवा आजकाल बहुतेक ठिकाणी ) स्वर्गाचा नरकही होत असतो. मग स्नायू हतबल स्टीफनजी, स्वर्ग-नरक, नाहीतच असे कसे म्हणावे ?<br /><br />----------------------------------------------------------------------------the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-11334622210183169952011-04-24T22:57:00.000-07:002011-04-24T22:58:20.279-07:00नारदाची कळ----१५<br />भ्रष्टाचारावरचा नवा तोडगा: जन-लोकपाल-फंड<br /> आत्ताशी शहाणे लोक जन-लोकपाल-बिलाचा मसूदा वाचायला लागलेत. आता बर्याच जणांना जाणवायला लागलेय की हे प्रकरण दिसतेय तेवढे सरळ नाहीय. कोणी सांगावे ह्या मागे कोण असेल व त्याचा लाभ कोणाला मिळेल. तर शेवटी काय, हे राजकारणी अण्णांच्या जन-लोकपाल-बिलाला बधतील असे वाटत नाही. <br /> आता ह्यावरचा अक्सीर रामबाण उपाय माझ्याकडे आहे तो जरा ऐका: "जन-लोकपाल-फंड":<br />१) एक फंड तयार करायचा, "जन-लोकपाल-फंड". ह्याचे सदस्य असतील त्या त्या मतदारसंघातले सर्व नोंदणीकृत मतदार. त्यांचे बॅंकेत खाते असणार, त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असणार, युआयडी ओळखपत्र असणार.<br />२) लोकपाल बिलातून ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी ह्या फंडात खालील प्रमाणे रोख रक्कम भरायची आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना जन-लोकपाल-संघटना एक एक्झेंप्शन सर्टीफिकेट देईल, ज्यानुसार त्यांना जन-लोकपालांच्या भावी कारवाईतून मुक्ती मिळेल ( फक्त एक वर्षासाठी ):<br />नगरसेवक : रुपये : १ लाख<br />जिल्हा परिषद सभासद : रुपये : २ लाख<br />विधानसभा सदस्य : रुपये : ५ लाख<br />राज्याचा मंत्री : रुपये : १ कोटी<br />राज्याचा मुख्यमंत्री : रुपये : १० कोटी<br />लोकसभा सदस्य : रुपये : १० कोटी<br />केंद्राचा मंत्री : रुपये : १५ कोटी<br />केंद्रातले पंतप्रधान : रुपये : २५ कोटी<br />३) हा जन-लोकपाल-फंड दिल्लीत एकेठिकाणी असेल. भारतातल्या सर्व ठिकाणच्या शाखात त्यात पैसे जमा करण्याची मुभा असेल. त्यात जमा झालेली रक्कम समप्रमाणात प्रत्येक मतदाराच्या वैयक्तिक खात्यावर वर्षाच्या शेवटी हस्तांतरित करण्यात येईल. जन-लोकपाल-फंडाचे ऑडिटर ( किंवा लोकसभेचे सीएजी ) किती पैसे वाटायचे ते नक्की करतील.<br />४) एक्झेंप्शन सर्टिफिकेटचा भाव/दर दरवर्षी, कसा निधी जमा होतो, त्यावरून ठरवण्यात येईल. समजा खूप लोक पटापट पैसे भरताहेत असे दिसले ( उदा: २८ पैकी १४ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजा पैसे भरले, तर पुढील वर्षी त्यांचा भाव/दर प्रत्येकी १० कोटीहून वाढवून प्रत्येकी रुपये १२ कोटी करण्यात येईल. असेच वाजवी दर इतर राजकारण्यांसाठी ठरवण्यात येतील. हे पैसे राजकारण्यांनी निवडून आल्यावरच भरायचे असल्यामुळे व ज्यांना जरूर असेल त्यांनीच हे भरायचे असल्यामुळे ह्याने भ्रष्टाचार वाढणार नाही. ज्यांना आपण भ्रष्टाचार करणार नाही आहोत, अशी खात्री आहे त्यांना हे खर्च करावे लागणार नाहीत. तसेच समजा एखाद्याने एखाद्या वर्षी पैसे भरले पण कोणीच त्याच्याविरुद्ध काही तक्रार केली नाही तर दुसर्या वर्षी त्याने पैसे नाही भरले तर चालण्यासारखे आहे. तक्रार झाल्यावरही कोणाला मुक्ती हवी असेल तर तत्काल टिकीट जसे दुप्पटीचे असते तसा त्यांना दुप्पट दंड भरावा लागेल.<br />५) ट्रॅफिक पोलिसांनी वसूल केलेली दंडाची रक्कम वाटून घेतली तर जसा सामुदायिक जलसा होतो त्यावरूनच ही कल्पना सुचलेली आहे. ह्यात समजा राजकारण्यांनी दंड भरायचे कमी झाले तर चांगलेच आहे. कारण त्यावरून भ्रष्टाचार कमी होतोय असेच ठरेल. शिवाय आज राजकारणी जे मोकळे सुटतात त्याऐवजी चोराची पूर्ण रक्कम नाही तर काही तरी हाताला लागेल व ते सर्वांना वाटून दिल्याने सत्कारणी तरी लागेल. नाही तरी आजकाल सबसिडी अशीच बॅकेच्या खात्यातून द्यावी अशी सूचना पुढे येतेच आहे.<br />६) कोणी असा समज करून घेऊ नये की जन-लोकपाल-फंड हे बेकायदा कृत्य होईल. कारण अमेरिकेत व युरोपात प्ली-बारगेनींगच्या पद्धतीमुळे त्यांच्याकडे न्यायदानाचे काम खूपच लवकर व कमी खर्चाचे होते आहे. हा फंड हा एकप्रकारचा प्ली-बारगेनींगचाच एक प्रकार आहे, जो प्रगत देशात अगदी कायदेशीर समजल्या जातोय. <br /><br />---------------------------------------------------------------------------------------------the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-46629268510369163562011-04-17T22:02:00.000-07:002011-04-17T22:04:06.140-07:00अण्णांचा दुभाष्या<br /> आम्ही मागच्या वेळेसच दाखविले होते की जंतर-मंतरच्या उपोषणाच्या गादीवर बसलेले असताना, लोक सारखे अण्णांच्या कानात येऊन कुजबुजत होते. तर हे चांगले दिसत नाही म्हणून अण्णांनी आता प्रमुख मागणी केलेली आहे की त्यांना सरकारने एक दुभाष्या द्यावा. त्याप्रमाणे हा दुभाष्या आला व त्याच्या पहिल्याच मीटींगचा हा अनुवाद अण्णा वाचू लागले :<br /> १) ह्यापुढे होणार्या सर्व जलद-मृत्यू कार्यक्रमासाठी सरकार जंतर-मंतर येथे रोज न्याहरी पुरवील, शक्य तितक्या लवकर.<br /> ( In future, for all the fast-unto-deaths to be undertaken at Jantar-Mantar the Govt. will endeavour to break fast , as soon as possible.)<br /> २) ह्यापुढे जे कोणी जलद-मृत्यू चा कार्यक्रम हाती घेतील त्यांचे प्रत्येकी पाच सदस्य सरकार आपल्यात सामाऊन घेईल.<br /> ( Hereafterwards those who undertake fast unto death, the Govt., will co-opt their five members. ) <br /> ३) जर जलद-मृत्यूच्या एखाद्या सदस्याविरुद्ध भानगडीच्या काही कडा प्रसिद्ध झाल्या आणि त्या कडाही भ्रष्ट आहेत असे जाहीर झाले,तर त्या सदस्याला राजीनाम्यापासून मुक्ती मिळेल.<br /> ( If any CDs are published about any member of the fast-unto-death, and if these are found to be corrupt then that member will be exempt from resignation. ).<br /> ४) जरी सभ्य-समाजाच्या सभासदांनी आपापल्या संपत्ती जाहीर केलेल्या असल्या तरी अ-सभ्य-सभासद तसेच करण्यास बांधील असणार नाहीत.<br /> ( Notwithstanding the self-disclosure of property by the members of the civil society, the others would not be bound by the same.)<br /> ५) ह्या पुढचे सर्व सभ्य-समाजाचे सभासद असे असतील की ते मायला, भूषणच असतील.<br /> ( All the future members of the civil society will be such that they will adorn the mother country.).<br /> ६) सर्व सभ्य-समाजाच्या सभासदांच्या सूचनांना प्रत्येकी एकेक टोपी घातली जाईल.<br /> ( The suggestions given by the civil society will be capped at one suggestion each ).<br /> ७) ह्यापुढले कोणतेही जलद-मृत्यूचे कार्यक्रम, हे काळे-टपाल न समजता सरकार ते स्वीकारील . <br /> ( The fasts-unto-deaths undertaken hereafterwards, would not be considered as black-mail and govt., would accept these. ).<br /> ८) पहिल्याच मीटींग मध्ये असे ठरले की सर्व पंतप्रधान, मंत्री, खासदार , सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी व इतर अर्जदार हे लोकपालांच्या अधिकार कक्षात येणार नाहीत. ( जसे अर्ज येतील, तसे त्यांच्याविरुद्ध स्ट्राईक करण्यात येतील.).<br /> ( After due discussion, it was decided that PM, Ministers, MPs, and secretary level beurocrats would fall / not fall under the jurisdiction of the lokpal-bill, as applicable. ). ( Strike out whatever is not applicable ).<br /> ९) ह्यापुढची मीटींग, योग्य अभ्यासक्रमात , मे मध्ये घेण्यात येईल.<br /> ( The next meeting, may be held in due course. ).<br /> १०) खासदारांना जसे लोकसभेत दुभाषी-कान-फोन असतात तसे वा मानवी दुभाष्ये अण्णाना हजारोंनी पुरविण्यात येतील.<br /> ( As the mechanical interpreting head-phones are provided to MPs , the same and/or human translators would be provided to Anna Haazare ).<br />विशेष सूचना: सर्व सरकारी निर्णय मुळात इंग्रजीत घेण्यात आले आहेत, ते फकत सोयीसाठी त्यांच्या मायला, जिभेने दिलेले आहेत.<br />(NB: Official resolutions are made in English and are translated for the convenience of the mother tongue speakers ) <br /><br />------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-68017507466766939092011-04-08T21:54:00.000-07:002011-04-08T21:56:39.863-07:00नारदाची कळ---१३<br />अण्णांचे फिक्सिंग<br /> २-जी, कॉमनवेल्थ, आदर्श, नोट-फॉर-व्होट, देवास, सीव्हीसी व अशा अनेक घोटाळ्यांमुळे कॉंग्रेसची छबी मळली, हे तर त्यांनाही कळलेच. तशात तीन-चार राज्यात निवडणुका लढवायच्या आहेत. तिथेही ह्या भ्रष्टाचारामुळे मार खावा लागेल. आता भ्रष्टाचाराची ही छबी धुवायची तर आपण भ्रष्टाचार विरोधी आहोत, हे लोकांना सहजी पटेल असे व्हायला पाहिजे. भ्रष्टाचार न करता राज्य करणे, हे तसे जिकिरीचे व लांब पल्ल्याचे काम. त्याच्याने छबी धुवायला खूपच उशीर लागेल. गेले तीन चार महिने आपले संवाददाते तुमच्यापेक्षा आम्ही बरे आहोत, निदान कारवाई करतो आहोत, असे घसा फोडून फोडून तसा प्रयत्न करताहेत . पण ते कसे तुलना केल्यासारखे होते. आधी त्यांचे नाव घ्यावे लागते. आम्हीच बेश्ट आहोत असे ठसवायला हवे. तर मग स्वच्छ वागून दाखवायला हवे. पण, तितका वेळ आहे कुणाकडे ? मग मालिकेत कसे, नायिकेचे चारित्र्य उठविण्यासाठी खलनायकाला अडचणीत आणतात, त्याला हाणतात, तसे, शत्रूचा शत्रू तो मित्र, ह्या वळणाचे काही तरी पटकन करायला हवे. हे कसे करायचे ? ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करायची वगैरे बाळबोध मार्गाने एकतर वेळ चिक्कार लागेल व शिवाय त्यात आपला काय फायदा ? आणि तरीही छबी अशी झाली पाहिजे की बघा, आम्ही किती भ्रष्ट्राचार्यांच्या विरुद्ध आहोत हे पटकन जनतेच्या ध्यानात यायला हवे. <br /> तर साहेब, तुम्ही ते हिंदू आतंकवाद्यांचे चित्र उभे केले होतेत, तसे काही कराना. तुमच्याकडे एवढ्या आयडिया असतात. मग जमले तर तुमच्या लव्हासाचे बघू ना काही निस्तरता येते का ते. तर काही तरी छबी सुधरवण्याचे बघाच . भ्रष्टाचाराच्या विरोधी आहोत असे चित्र तयार होईल असे काही तरी बघा ना.<br /> हां. भ्रष्टाचार का ? भ्रष्टाचार-विरोधी छबी काय ? बरं, अरे ते आपले अण्णा काय करताहेत आजकाल ? काही नाही ? लोकपाल बिलाचा आराखडा वगैरे करताहेत. व्वा ! व्वा ! बेस ! काम झाले की. त्यांना बोलवा इथे. बसवा जंतर मंतर ला. फार तर काय, तर बिलाचे करावे लागेल एवढेच ना ? अशी तर, ढीगभर बिले पडून आहेत आपल्याकडे. त्यातून नंतर काही तरी मार्ग काढता येईल. शिवाय नंतर कमीटीतही काहीतरी करता येईलच. पण आत्ता तर परस्पर रान पेटवून आपली पोळी शेकता येईल. फक्त माझे नाव मध्ये आले नाही पाहिजे. ते अवघड नाही हो, तुम्ही चिडून कमीटीतून बाहेर पडा, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. पण थोडे ताणून धरले पाहिजे. जॉइंट कमीटीसाठी . असे कसे करता येईल म्हणायचे . मग पार्लमेंटच बरखास्त करा म्हणायचे . मग कमीटीत पाच जण घेतो म्हणायचे, मग नोटिफिकेशन नाही काढत म्हणायचे . आत्ता मॅडम दक्षिणेत निवडणूक-प्रचारात आहेत म्हणायचे . आणि मग मी सांगीन तेव्हा हो म्हणायचे. मग अण्णांची तारीफ करायची. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे खूप स्तोम माजवायचे . पाहिजे तर भारत-रत्नही द्यायचे. मग आपसुकच आपण त्यांचे मानले, म्हणजे आपण त्यांच्या बरोबरच होतो, हे वेगळे सांगायला नकोच. निवडणुकात बघा ह्यावरच मतं मिळतात की नाही. <br /> पण, हे बघा, हे सगळे आमच्या आय-पी-एल च्या आधी संपले पाहिजे हां. नाही तर आमचा धंदा मंदा व्हायचा !<br /> ओ के ? फिक्स ?<br /><br />----------------------------------------------------------------------------------the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-84918639227843114792011-02-01T02:41:00.001-08:002011-02-01T02:41:58.418-08:00जातीच्या लेखकाला, जातीचा पद्मश्री !<br /> नेमाडेंना पद्मश्री मिळाल्याबद्दल काय वाटते ? असे जे विचारतात, त्यांना सांगावेसे वाटते की, प्रथम त्यांनाच काय वाटतेय ते बघूया. आता त्या थोर थोर मिशीतले, ह्या मिशाने ऐकायला मिळणार, असे वाटून गर्भगळित व्हायचे कारण नाही. कारण प्रत्येक दृष्ट्या पुरुषांसारखे त्यांनी, हे देशीवादी परंपरेने मागेच सांगून ठेवले आहे. कसे ते पहा: (टीकास्वयंवर पृ.३८३) "एकतर राष्ट्रीय पारितोषिकं ही कंपूशाहीतून निर्माण होणार्या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात."<br /> कंपूशाही, दोनचार मूर्ख माणसं, असे कळीचे शब्द ऐकून भालचंद्र मुणगेकरांना वाटले असेल ह्याला "मागचे" कळले की काय ? तरी बरे की सिमल्याच्या शिष्यवृत्तीचे मीच जमवून आणले होते, ते हा विसरला की काय ? मग राडीया टेप्स कोणी लीक केल्या ह्या चालीवर ते प्लंबरसारखे लीक हुडकू लागले. तोच त्यांना राष्ट्रपतीभवनातून फोन आला की, "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं !"<br />आता महाराष्ट्राचा कोटा, यादी, केव्हाच संपली असताना, आता बाई कोणाचे सांगताहेत बरे ? एकच काम अनेक जणांनी वाटून घेण्याच्या तीळ-संस्कारा प्रमाणे, बाईंनी विलासरावांनाही निरोप दिला. विलासरावांना कळेना की एवढा काय प्रॉब्लेम त्यात ? आपण घालू तो आदर्श ! मग कळले की महाराष्ट्राच्या कोट्यात, साहित्याच्या जंत्रीत, बाईंच्या पसंतीचे नाव काही नव्हते. ते राहिलेच. <br /> विलासराव गेले शिंद्यांकडे. शिंद्यांनी धूर्तपणे विचारले की बाई एक्झॅक्टली काय म्हणाल्या ? आता "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं!" ह्यातून अर्थ काढायचा होता. शिंदे तसे कशातूनही "अर्थ" काढण्यात पटाईत. ते म्हणाले बाई म्हणाल्या "आमच्या त्या ह्यांचे", म्हणजे कोणी लेवा-पाटील असणार. कोण बरं ? लेवा पाटील म्हणतात की मूळचे पाकीस्तानातल्या पंजाब मधले, लाहोरचे. आता त्या अफझल गुरूचा कोणी आहे की काय ? काही नेम नाही ! जरा मोघम चौकशी करू. आधी दरवानाला विचारतात, कौन मुसलमान हौ क्या ? दरवान हिंट देतो, नही जी, हिंदू ही है !<br /> तेव्हढ्यात मुणगेकर म्हणतात अहो "हिंदू"म्हणजे नेमाडे असतील. कारण तेच एकमेव लेवा आहेत मराठीत, बहिणाबाई नंतर !<br /> विलासराव म्हणतात की उगाच रिस्क घेऊ नका. मॅडमनी सांगून ठेवलेले आहे की बाईजींवर उगाच प्रेशर येऊ देऊ नका. त्या आपल्या अफझल गुरूचे पाहताहेत ना, मग त्यांच्या एका हिंदू चे आपण पाहू शकत नाही का? चला जरा प्रयत्न करू ! मुणगेकर, काय आहे हो हे हिंदू ? त्यावर मुणगेकर म्हणतात की तसे साहित्य अकादेमीला सांगितलेले होते... पण अजून त्यांनी काही पुरस्कार दिलेले नाहीत. तेव्हा बाईंना आत्ताच काही करायचे असेल... तसे हे लेवा पाटील मूळचे पंजाब, पाकीस्तानातल्या लाहोरचे. मग विलासराव माहीती काढतात की पंजाबची लिस्ट झाली का फाइनल.? झाली ! हरयाणाची ? ती अजून बाकी आहे. असं म्हणता ? मग काही प्रॉब्लेम नाही. नुकतेच विश्वास पाटिलांनी नाही का सांगितले की पानीपतानंतर भाऊ वगैरे मंडळी हरयाणातच होती व तिथे त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते लोक चालीरीती, फेटा वगैरे मराठी वळणाचाच बांधतात. आपण त्यांच्याच फेट्याला हे लचांड बांधू .<br />अफजल गुरूच्या बदल्यात जमले म्हणायचे की !<br /> तुम्हाला वाटेल का उगाच जात काढताहेत अशा वेळी ? तर तेही नेमाडेंनीच शिकविले म्हणावे लागेल. जात काढण्यात काय संकोच ? म्हणूनच तर त्यांनी "हिंदू" त ज्ञानेश्वरांची व रामदासांची जात आरामात काढली आहे. कुणब्यांचीही काढली आहे. एवढेच काय सिद्धार्थ गौतमालाही दूषणे दिली आहेत. शिवाय अशा जाती काढून त्यांनी वेळोवेळी आदर्श घालून दिले आहेत. जसे:( टीकास्वयंवर पृ.३७९ ):"आमच्या वेळी साधना होती...आज साधना ही ट्रस्ट समाजवादी चित्पावनांनी बुडवली. केसरीच्या सिंहाला गवत खायला लागलं. सेवादलातली समाजवादी माणसं कटटर जातीयवादी निघाली." ( इत:उप्पर ते अभिमानाने म्हणतात की त्यांना फक्त ( नशीब, फकत, नाही ! ) साने गुरुजी भावतात व त्यांनी साधनेत एक वर्ष नोकरीही केली आहे. ).<br /> खरे तर २००१ साली महाराष्ट्र फौंडेशनने नेमाडेंना जीवन-गौरव पुरस्कार दिलेला होता. म्हणजे ते तेव्हाच बक्षीस मिळालेले लेखक झालेले होते. त्यांनी इतर लेखकांना आदेश दिला आहे तो असा: "अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा, असं मी चांगल्या लेखकांना सांगेन. कारण बक्षीस मिळालेल्या लोकांच्या यादीत बसण्यापेक्षा ते न मिळालेल्या लेखकांच्या यादीत जाऊन बसणं अर्थातच सोपं असतं." ( टीकास्वय़ंवर पृ. ३८४ ). ३५ वर्षात हिंदू ने त्यांना इतकं पिडलेलं दिसतं की त्यांनी स्वत: कुठल्या यादीत बसायचं हेच ते विसरले असावेत ! किंवा मग विद्रोह भावला असावा ! आदत से मजबूर !<br /> तर असा जातीच्या लेखकाचा जातीचा किताब !<br /><br />-----------------------------<br />अरुण अनंत भालेराव<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-58674108594461252822011-01-15T03:01:00.000-08:002011-01-15T03:02:05.415-08:00नारदाची कळ---१२<br />अकलेच्या कांद्याची गोष्ट<br /> एक होता कांदा. अहो तो महाग-वाला नाही, अकलेचा. अकलेला मती म्हणतात, तर हा बारा अकलेचा ! ( कदाचित बारामतीचा !) तो अगदी पहिल्यांदा बेता बेताने, बांधा बांधाने ( कुंपणा कुंपणा ने ) लागवडलेला होता. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. तोच कुंपणाच्या देवाने, कराडच्या देवाने, त्याला आपल्यात घेतले, आपला मानसपुत्रच मानले व स्वत:सारखे "यशवंत" केले. ह्यानेही सहकार दिला, घेतला. होता होता, हा सगळीकडेच वावरू लागला. राज्यात मुख्य झाला, केंद्रात सुरक्षेच्या बाडबस्तात सुरक्षित झाला. कांद्याला असे घुमारे फुटू लागल्यावर त्याला आपल्या मुळाचा लईच अभिमान वाटू लागला. कोणाचे मूळ परदेशी असेल तर ते त्याला रुचेना. त्यासाठी त्याने आपापल्या मुळांचा देशी वाफाच काढला, ताफा वाढवला व विदेशी मुळांना तो कमी लेखू लागला.<br /> पण भारतदेवाच्या मनात काही वेगळेच होते. परदेशी मुळाचे कांदे जोम धरू लागले, त्यांना कुठली तरी सूप्त परदेशी गंगाजळी मिळू लागली व त्या परदेशी कांद्याने चांगलेच बाळसे धरले . सगळे वावर व्यापून टाकले. आता बांध्यावरच्या कांद्याला मुख्यप्रवाहात डुंबावे असे हुळहुळू लागले. मग त्याने मुळेच ना ती, ती देशी काय व परदेशी काय असे म्हणत परदेशी मुळांच्या कांद्याशी दिलजमाई केली. परदेशी कांद्याला खांदा दिला, सापडेल तिथे चांद्या शोधल्या, जमवल्या, आणि देशात सगळीकडे आपल्या फांद्या पसरविल्या. <br /> परदेशी कांद्याची रीतच न्यारी. त्याला वाटू लागले मी किती निर्मळ, स्वच्छ संगमरवरी ( इटालियन संगमरवरच जणु ) रूप, काय ती उभारी, काय तो तोरा ! तेव्हढ्यात त्या परदेशी कांद्याला आतले आवाज ऐकू येऊ लागले. त्यालाही वाटू लागले आपण जरा आतल्या आतच रहावे. कावळा शिवल्यासारखे बाजूलाच रहावे . आपण पुढे होऊ नये. मग त्याने त्यातल्या त्यात धुतलेल्या तांदळासारखा वाटणार्या पंजाबी कांद्याला पगडी पहनवली. पगडी, आनंदाने परदेशी कुंकू मिरवू लागली. बारा-अकलेच्या कांद्याने वाफ्यात नफा काढायची जबाबदारी घेतली. सगळीकडचे वाफे तरारून येतील, असे तो सांगू लागला. आपले मूळ गाव, बारा-अकली गाव, असलेल्या राज्यात देशी-विदेशी कांद्याची जोड-लागवडही त्याने चालू ठेवली. <br /> बारा-अकली कांदा जोशात आला, उडू बागडू लागला, खेळ खेळू लागला. असा तसा देशी खेळ नाही तर परदेशी कांद्याला टुकटुक करणारा, त्याची विकेट काढणारा, परदेशी खेळ, क्रिकेट ! हा खेळ इतका चढू लागला की त्या बोभाट्या पाई त्याला लोक पीयेल समजू लागले. तो म्हणे काय बोलता, मी ? आय पीयेल ? <br /> वाफ्यावरचे काम असे चालू असताना एक अवघड घडी आली. वाफ्याचा खर्च ताफ्याला परवडेना . ताफ्यातले एकेक गडी आत्महत्येने पडू लागले. सगळीकडे गदारोळ माजला. बारा-अकली कांद्याने थाप ठोकली, ही कांद्याची शेतीच परवडणारी नाही . सबब कोणी कांदे पेरुच नयेत. पगडी गदगदली. तिला वाटले जीव वाचला तर पगडी काय, पचास पेहनू . मग त्याने ताफ्याला सर्व-माफी दिली, कर्ज-माफी दिली. बारा-अकली कांद्याला हुरूप आला. त्याने आता थंड हवेच्या ठिकाणी लागवड होऊ शकते का, हे पाहण्यासाठी डोंगर कापले, दर्या बुझवल्या व उंचावर एक ठिकाण केले, इतके छान की बारा-अकली कांदा अगदी "हवासा" झाला, लव्हासा झाला !<br /> तेव्हढ्यात कोणाची तरी नजर लागली. आतल्या गाठीच्या ह्या बारा-अकली कांद्याच्या तोंडाशी एक गाठशी आली. फवारून झाले, टोकरून, खुडून झाले. तशी तरारी आहे, खतपाणी अंगी लागते आहे. पण त्या तोंडाच्या गाठी मुळे तोंडातून शब्दांऐवजी आजकाल मुक्ताफळेच येतात. लवकरच आलबेल होईल असे म्हणायचे असते, पण तोंड बोलून जाते...कमसे कम तीन हप्ते लगेंगे ! परदेशी कांद्याचा छोटा कोंभ, हूल देत, मग रागावून म्हणतो, मेरे दादी का राज अकेली का था, ये हमारी मजबूरी है, ( मजबूरी का नाम गांधी !). त्यावर तोंड लगेच तावातावात उदगारते, इटली मे भी मजबूरीच है ! पगडी घाबरून पाकी कांद्याला पाचारण करते तर तोंड लगेच खोड काढते, ह्यापेक्षा आपल्याच बळीराजांना का नाही देत जरा ज्यास्तीचा भाव ? <br /> पानीपतावर मराठयांची पत गेल्याला भले आज अडीचशे वर्षे झाली असतील, पण त्याचा वचपा काढतोय, बघा, बारा-अकली कांदा व त्याचे तोंड !the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-63629097983608270092010-12-27T20:10:00.001-08:002010-12-27T20:10:34.831-08:00नारदाची कळ----११<br />जगतगुरू कोंड देव !<br /> जरा विचार करून पहाल तर इतिहास-तज्ज्ञाशिवाय तुम्हाला पटेल की दादोजी कोंड देव हे शिवाजीचेच काय सगळ्या जगाचेच गुरू आहेत. जगतगुरू !<br /> संभाजी ब्रिगेड पासूनच बघा. ह्यांच्या निडर कार्यकर्त्यांनी मागे जे भांडारकर संस्थेत घुसून शौर्य दाखविले त्याचे खरे श्रेय व प्रेरणा कोणाची ? तर आब दवडणार्या आबांची ! राष्ट्रवादीची. कशी ? इतर कोणत्याही सरकारने ह्यांना कोंडले असते तुरुंगात. पण ह्यांचेच कोंड देव ( इतने बडे शहर मे ऐसे हादसे अक्सर होते रहते है--फेम ! ) ह्यांच्याकडे कानाडोळा करते झाले. म्हणजे गुरू झाले कोंडदेव, व तेही दादागिरी करणारे दादोजी !<br /> यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती निमित्त पवार साहेबांनी एक फार मौलिक निरिक्षण नोंदवले की एवढे आयुष्य काढून यशवंतरावांची वैयक्तिक मालमत्ता किती ? तर अवघी, एक दोन लाखाची. जे पवार साहेब म्हणाले नाहीत ते "आणि माझी ?" ते आपण म्हटले तर ? ह्यांच्याही सर्व प्रगतीचे श्रेय कोणाला ? तर कोंड देवांना ! म्हणजे कोण ? तर कुटुंबाची माया, प्रकृती, ह्यांना कोंडते ! शेती परवडत नाही, कर्ज माफी देऊ नये, कांदा अजून महागणार, परदेशात शेती करा असे असंख्य उदगार जे तोंड काढते त्यालाच कोंडणारा हा कोंडदेव रोग ! दर महिन्या दोन महिन्यातून त्याला डागण्या मिळतात !<br /> कुटुंबाची माया ही फार मोठी कोंडणारी देवता आहे. अशोक चव्हाणांना विचारा ! बाकीचे सर्व पचले आणि नेमके नातेवाईकांच्याच आदर्श घरांनी घरघर लावली. इतके करूनही वखवख थांबत नाही. ही थांबवायला एकच देव समर्थ आहे व तो म्हणजे कोंड देव ! त्याला शिवाजी पासून कापून काढला तर आता तो कोणाला का सोडील ?<br /> सर्व विश्व हे एक खेळाचे मैदान आहे व सर्व पैसा-अडका हा एक पोरखेळ आहे असे वाटणार्या वैमानिकाचे मनसुबे हवेत झेप घेत असतात. त्याला एकमेव भेव आहे ते कोंडण्याचे, कोंड देवाचे ! तरच तो जमीनीवर येणार !<br /> क्षणात ब्रिगेड बनणारी जात लगेच मागासलेली बनून आरक्षण मागू पाहते, सत्ता काबीज करण्यासाठी इटालियन व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणत म्हणत शेवटी त्यांच्यासमोरच कण्हत कण्हत उभी राहते आणि ह्या सगळ्या नाट्याला भूलून जर जनता ह्यांनाच निवडून देत असेल तर जनतेलाही असेच कोंड देव लखलाभ होतील ! जय जगतगुरू कोंड देव !the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-50325768063959342032010-12-17T21:02:00.000-08:002010-12-17T21:03:29.111-08:00नारदाची कळ-----९<br />सोपी लिकिते !<br /> विकी-लीक्स ने इतके भंडाऊन टाकले आहे की आता "गुपिते"ला पर्यायी शब्दच झाला आहे : "लिकिते" !. मराठीत र्हस्व दीर्घाची भानगड ह्या शब्दाला लागू होत नाही. म्हणजे कोणी र्हस्व लि व कि वापरले व लिहिले "लिकिते" तर इंग्रजीतले टू लिक म्हणजे चाटणे हा अर्थ धरून हे कोणाचे चाटण आहे ते लोकांनी पहावे. व जर ली व की दीर्घ काढली तर नैतिकता कोणाची लीक होते आहे ते पहावे. आता इतके लीक्स होऊन होऊन सगळा माहोल इतका दल-दलीत झाला आहे की सरळ साध्या गोष्टी आता "सोपी लिकिते" ह्या नावाने प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकी काही वानगी दाखल पहा:<br />१) राहूल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदू दहशतवाद हा भारताला ज्यास्त धोकादायक आहे का, ह्याची पाहणी सीबीआय ने केली. त्यात त्यांना आढळले: हिंदू दहशतवादी हे फारच बेभरवशाचे आहेत. ते उग्र आंदोलने करतील असे वाटते पण तेव्हा ते करीत नाहीत. राम मंदीर बनवायचे म्हणतात पण बनवत नाहीत. कित्येक ठिकाणी ह्यांचे बॉम्ब फुसके निघतात, फुटतच नाहीत. हे निरनिराळे प्लॅन्सही योजून रद्द करतात. आरएसएस च्या प्रमुखांना मारणार म्हणतात पण कोणीच मारीत नाहीत. आजकाल तर ह्यांच्या संघटना कमालीच्या विचित्र झाल्या आहेत. उदा: गुजरातेत ह्यांच्या पार्टीत मुसलमान निवडून येतात तर हे पार्टीचा प्रवक्ताच मुसलमान ठेवतात. मालेगावच्या प्रकरणातही आढळते आहे की ह्यांनी स्फोटके मुसलमानांकरवी ठेवली. असे जर वाढू लागले तर पुढे चालून भगवा व हिरवा दहशतवाद ओळखू न आल्याने सीबीआयला रंगांधळे व्हावे लागेल.<br />२) वरील बाबीचा धसका घेऊन सरकारने हिंदूंच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता एक कमिशन नेमले आहे. निवृत्त न्यायाधीश मोहमद रचसा ( हे गृहस्थ "साचर" च्या अगदी विरुद्ध आहेत हा निव्वळ योगायोग समजावा !) सध्या पाहणी करीत आहेत. त्यांचे काही निष्कर्ष : हिंदूंना कधीही आरक्षण नव्हते. त्यामुळे त्यांना सर्वत्र स्पर्धेला तोंड देऊन जगत राहावे लागले. त्यात ते सारखे यशस्वीच होत राहिले. त्याची मुसलमानांना खूप असूया वाटते. तर हा असमतोल घालवण्यासाठी शासकीय नोकर्यात हिंदूंना मुसलमानांसारखेच १५ टक्के आरक्षण द्यावे. म्हणजे ते थोडे तरी सुखावतील व आळशी होतील. तसेच सीबीआय च्या पाहणीनुसार सध्या गुन्हेगारात ४० टक्के मुसलमान आढळतात व हिंदू केवळ १० टक्के. तर हाही असमतोल घालवण्यासाठी हिंदूंना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. विशेषत: मोठ्या गुन्हयासाठी. जसे पार्लमेंटवर, मुंबईवर हल्ला करणे. फार तर ह्यात आझमगढी मुसलमान बंधू त्यांचे प्रशिक्षण करू शकतील. त्यांना फाशी-माफी देण्याचा सरकारही विचार करील.<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-3175246308890510702010-12-02T21:03:00.000-08:002010-12-02T21:04:09.522-08:00नारदाची कळ---१०<br /><br />ई-टाली एका हातानेच वाजते !<br /> टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !<br /> भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !<br /> बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !<br /> ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !<br /> जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-75675406434211336672010-12-02T20:49:00.000-08:002010-12-02T20:50:35.040-08:00नारदाची कळ---१०<br />ई-टाली एका हातानेच वाजते !<br /> टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !<br /> भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !<br /> बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !<br /> ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !<br /> जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-29995426734377286362010-11-21T23:57:00.000-08:002010-11-22T01:17:37.041-08:00नारदाची कळ---९<br />जेपीसीचे पिसे<br /> रोज लोकसभेत तोच जेपीसीचा गदारोळ पाहून वाटायला लागते की कॉंग्रेस सर्व दोषींना शिक्षा द्यायला तयार आहे, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत सीबीआयची मदत द्यायला तयार आहे, पण जेपीसी मार्फत नाही तर पीएसी मार्फत. आणि त्या पीएसीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी असताना विरोधी पक्षांना जेपीसीच हवी आहे, ती का ? <br /> जेपीसी त सभासद घेताना परत कॉंग्रेसचेच सभासद ज्यास्त असणार आहेत, त्यामुळे निष्कर्ष विरोधात जाईल ही भीती नाहीय. पण सारखे सर्व प्रकरण लोकांसमोर ठळकपणे येत राहणार व त्याने बदनामी होणारच. आता पहिल्याच जेपीसीचे बघा. ही नेमली होती, बोफोर्स घोटाळ्यासंबंधी. काय झाले ? शिक्षा कोणाला झाली ? शस्त्रास्त्रे खरेदीच्या नियमांमध्ये काही सुधारणा झाल्या का ? अजूनही नवनवे संरक्षण खात्यातले घोटाळे होतच आहेत. मग मिळाले काय ? तर राजीव गांधींच्या चारित्र्यावरचा डाग धुतल्या गेलाच नाही. त्याची जबर किंमत चुकवावीच लागली. ह्यालाच सोनियाजी घाबरत असाव्यात.<br /> गंमत म्हणजे अगदी ह्याअगोदरची जेपीसी कमीटी शरद पवारांच्या अध्यक्षतेखालची होती. शीतपेयात घातकी कीटकनाशके आढळली त्याविरोधात. त्याचे काय झाले, ते कोणाला माहीत आहे ? कोणते पाणी शीतपेयवाल्यांनी वापरावे ते सुद्धा नक्की झाले नाही, बंदी तर कोणावरच झाली नाही. हवे ते शीतपेय, तसेच, अजूनही राजरोस मिळते आहे. म्हणजे ह्यापुढे कोणी ए.राजा सारखा भ्रष्टाचार करणार नाही अशी काही व्यवस्था करण्यासाठी जेपीसी हवी असे म्हटले तर खरे आपल्याला सहजी समजू शकेल. मागच्या इतिहासावरून ! ( नाही म्हणायला हर्षद मेहता प्रकरणावरच्या जेपीसी ने शेयर बाजारावर थोडी नियंत्रणे आली हीच एक जमेची बाजू जेपीसीची ! ). जेपीसी द्वारे कोणाला शिक्षा व्हावी, व्यवस्थेत सुधारणा व्हावी ही अपेक्षा अगदी बाळबोधपणाची ठरते. पण सत्ताधार्यांना धक्का द्यायला हे हमखास उपयोगी शस्त्र आहे ह्याबाबत दुमत असू नये.<br /> परदेशातले काळे धन परत आणण्यासाठी आपण किती व कसे प्रयत्न केलेत ते सांगतांना प्रणब मुखर्जी नुकत्याच झालेल्या लीडरशिप समिट मध्ये म्हणाले होते की एका देशाने आम्हाला एका माणसाची माहीती दिली व त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकरून वाढीव कर वसूलही केला आहे, पण त्या देशाचे वा माणसाचे आम्ही नाव सांगू शकत नाही. खूप प्रयत्नांचे हे हाल असतात तर जेपीसी वगैरेतून गेलेले पैसे परत मिळणे विसराच !<br /> विरोधी पक्ष व सरकार ठामपणे जेपीसी का हवी वा का नको हे सांगत नाहीत त्यामागे ही कारणे आहेत हे सूज्ञांना मात्र लगेच ध्यानात यावे !<br />अरुण अनंत भालेराव<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-17659640148123140842010-10-22T09:58:00.000-07:002010-10-22T10:00:05.925-07:00नारदाची कळ---८<br />आमुचे आम्ही वाया गेलो<br /> परवा जालना येथे नेमाडेंना "कोठारे" पुरस्कार देण्यात येणार होता. पुरस्कार रु.२५ हजारांचाच होता. पण त्यानिमित्त लाख मोलाची गरळ ओकता आली असती, ती तशीच राहिली. हे कोठारे कोण आहेत ? खरे तर आता मराठी साहित्यसंमेलनास माणिकचंद गुटखा वाल्यांनी भरघोस मदत द्यावी, आपल्या गृहमंत्र्यांनी "ऐसे छोटे मोठे हादसे होते रहते है" असे म्हणत गुंडांसोबत पार्ट्या कराव्यात, असा उफराटे वागण्याच्या काळात हे कोठारे कोण हे गैरलागू होते. समजा ते गुटखा बनवणारे उद्योजक असतील तर आपण काही टाटांचे हॉस्पिटल चालवत नाही आहोत ( जिथे बोर्ड लिहिलेले असतात की तुम्हाला गुटखा खाऊन कर्क रोग झाला असेल तर त्यावर इथे उपचार करण्यात येणार नाहीत .). आपली तर साधी साहित्यिक दुकानदारी आहे. त्यात कसली आली आहे साधन-शुचिता !<br /> "आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या लेखकांच्या उथळपणातून व अप्रामाणिकपणातून येतो, हे जर खरे असेल तर आपल्या लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत ?" असे नेमाडे आपल्याला एकेकाळी विचारून गेले आहेत. आता तेच विचारताहेत तर एक वाचक म्हणून त्यांना सांगणे आपले उत्तरदायीत्व ठरते. कारण हा पुरस्कार ही तर नुकतीच सुरुवात आहे. असे किती तरी पुरस्कार त्यांना "हिंदू" वर घ्यायचे बाकी आहे. "सरकारी बक्षीसाच्या चढाओढीत प्रकाशकांचा किती सहभाग असतो हे प्रत्यक्ष क्षेत्रातल्यांना नीट माहीत आहे, काही लेखक तर प्रकाशकांच्या रखेल्याच आहेत" हा सल्ला त्यांना एक तरुण लेखक( नेमाडे, टीकास्वयंवर, पृ.३७) देतो आहे, हे त्यांनाच आता पटणार नाही. पण बोलना बनता है भिडू !<br /> "पारितोषिकांचा साहित्यिकाच्या कसाशी फारसा संबंध नसतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही नोबेल सारखी बक्षिसं असाहित्यिक कारणांवरूनच दिली जातात....अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा , असं मी चांगल्या लेखकांना सांगेन"(टीकास्वयंवर पृ,३८४). असं जर दस्तुरखुद्दांचं म्हणण असेल तर मग नेमाडेंनी गुटखा पुरस्कार स्वीकारावा का ? आता अमेरिकेचे निम्मे भाडे तरी निघेल, हे खरे. शिवाय ज्या "लेखन-बाह्य" राळेमुळे १५ हजार प्रती खपल्या, त्याला अजून थोडी गरळ ओकून हातभार लावता आला असता.<br /> वाचकांच्या दृष्टीने शेवटी (वाचाल तर वाचाल !),सर्व वायाच जाते, तर लेखकाने तरी "आमुचे आम्ही वाया गेलो" का होऊ नये ? <br />लई भंकस झाली राव, गुटखा तरी काढा, हिंदुराव !<br /><br />अरुण अनंत भालेराव<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-14903013345870784162010-08-12T11:15:00.000-07:002010-08-13T08:53:16.112-07:00नारदाची कळ---७<br /><br />आम्ही Vs तुम्ही<br /><br />चार्ल्स शूमर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे न्यू यॉर्कचे सेनेटर. त्यांच्या कॉंग्रेस मध्ये ६०० मिलियन डॉलरचे बॉर्डर सेक्युरिटी बिलावर बोलताना ते म्हणाले की जशी सरहद्द महत्वाची तशीच त्या आत होणारी वागणूक महत्वाची. अमेरिकेची ज्यास्त पगाराची कामे काही कंपन्या बाहेरच्या देशात ( जसे: भारत ) देतात, तिथून स्वस्तात माणसे इथे आणतात व कर मात्र अमेरिकन जनता भरत राहते. तर ह्यांची माणसे इथे ज्या व्हिसावर येतात त्याची फी वाढवून २ हजार डॉलर करावी. इथे चोरीच्या गाड्या विकणारी गॅरेजेस असतात ज्यांना हे "चॉप शॉप" म्हणतात व गाडीचे पार्टस खिळखिळे करून मग ते विकतात. शूमरांच्या मते इन्फोसिस कंपनीही असेच एक प्रकारचे चॉप शॉप आहे.<br />आता ह्यावर भारतीयांना वाईट वाटणे साहजिक तसेच अमेरिकनांना स्वस्त भारतीयांचा राग येणे रास्त. आपल्याकडे नाही का आपण भय्यांना असेच बदडून काढीत. इथे निदान तसे भारतीयांना बदडत नाहीत हा अमेरिकनांचा चांगुलपणाच म्हणायचा.<br />आपल्या लक्षात येत नाही, पण बाहेरचे लोक येऊन येऊन आता इथे इतके विचित्र चित्र तयार झाले आहे की दर १२ नवीन जन्मणार्या बालकात २ बालके बेकायदा आलेल्यांची असतात. आता तर ह्यांना जन्माने नागरिकत्व मिळू नये असे बिल कॉंग्रेस करीत आहे. एरव्ही मॉल्स मध्ये सुद्धा आजकाल गोरी माणसे कमीच दिसतात, ज्यास्त करून मेक्सिकन, भारतीय व काळेच असतात. आपण मुंबईत जसे मराठी टक्का कमी होतोय ह्याची बोंबाबोंब करतो तशीच ह्यांची अमेरिकन टक्का कमी होण्याची ही खळखळ आहे.<br />मराठी माणसांचे बस्तान चांगले बसले आहे असे वाटावे तोच कळायला लागते की कसले हे मराठी-पण ? ह्यांच्या पोरांना ना मराठी येते ना हिंदी. पसायदान म्हणू लागलो तर नातवंडे म्हणतात "नो मोअर सिंगिंग आजोबा !" असेच अमेरिकनांना वाटते, अरे आमच्या नोकर्या तरी ठेवा, आमचे वळण तर चाललेच आहे . <br />आम्ही Vs तुम्ही असे वाटत असलेला हा तिढा, हळुहळू आम्ही तसेच तुम्ही असा होत चाललेला दिसतोय !<br /><br />अरुण अनंत भालेराव<br />arunbhalerao67@gmail.com<br /><br /><br />Naardaachi Kal---7<br /><br />We Vs You<br /><br />Charles Schumer is a senator from New York and is a democrat. Speaking on the 600 million $ bill for Border Security he opined that companies like Infosis, who are taking away well paying American jobs and giving it to cheap Indians are like "chop shops" ! ( Where stolen cars are dismantled and sold as parts ). And all this is being paid for by Americans through their paying taxes. Hence they feel that fees for legal visa should be increased to 2000 $ per visa to partly recover the taxes.<br />Well, Indians are bound to feel bad about this because we get cast in a poor light as cheap labourers. And Americans are right within their world as the composition of population is changing very fast. We can only thank Americans that they don't beat us like we beat Bhayyas in Mumbai for being large immigrants there.<br />Society really changes very fast, while economy keeps us busy looking after each ones of us interests. Because if they count every 12 new born babies, 2 out of them are born to illegal immigrants. Now the American Congress is debating through their proposition whether the by-birth-citizenship should be denied to such illegal immigrants children.<br />Even during visits to the maals we can notice the changing colours of society when we see less of While families and more of Mexicans and Indians. The Americans' concern about loosing jobs is same as our concern for Marathis loosing jobs and houses in Mumbai.<br />And are we immigrants happy about this newly aquired prosperity and life ? No, we lament the loosing of our ways of life, all the time.<br />So, on this issue, what appeared as opening stance of, We Vs they, gets slowly changed to, We and they !<br /><br />Arun Anant Bhalerao<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-7314295386724785772010-07-30T12:01:00.000-07:002010-07-30T12:03:54.356-07:00नारदाची कळ--६<br /><br />नीतीचा रंग, रगेलांची अनीती <br /><br />सध्या अमेरिकेतले एक डेमोक्रॅटिक पक्षाचे वयोवृद्ध कॉंग्रेसमन श्री रेंजल ( स्पेलिंग प्रमाणे आपण यांना रंगेल म्हटले असते पण अमेरिकेत उच्चार स्वातंत्र्य असल्याने ते रेंजल म्हणतात ) चर्चेत आहेत. ८० वर्षांचे हे गृहस्थ न्यूयॉर्कच्या हार्लेम विभागाचे प्रतिनिधित्व करतात. समसमान १० सभासद असलेल्या एथिक्स कमीटीने ( नीती व्यवहाराची कमीटी असते ही किती दिलासा देणारी बाब आहे !) त्यांच्यावर एकूण १३ आरोप ठेवले आहेत. ह्यात मुख्य आहेत, स्वत:च्या नावावर होणार्या एका कॉलेजसाठी भरमसाठ देणग्या मिळवणे ( व त्या बदलात देणगीदारांचे कर कमी करून देणे ), अमेरिके बाहेत असलेल्या डोमिनिकन इथे एका बंगल्याची मालकी लपवणे व त्यावरच्या भाड्यापोटीचे कर न भरणे वगैरे. जोडीला काही तांत्रिक उल्लंघने आहेत. जसे : देणग्यांसाठी कॉंग्रेसची लेटरहेडस वगैरे वापरणे. सर्व बाबी पैशात मोजणार्या अमेरिकेत हे काही ७,८ मिलियन डॉलरचे प्रकरण तसे काही फार मोठे म्हणता येणार नाही. पण हे अवघड जागेचे दुखणे जरूर आहे. कारण नोव्हेंबरात निवडणूक आहे व ५० वर्षे बिनबोभाट निवडून येणार्या रेंजल यांना दोन तीन नवीन उमेदवारांशी लढावे लागणार आहे. शिवाय रेंजल ह्यांच्यावर फार कठोर कारवाई केली तर ते काळे असल्याने काळ्यांचा पाठींबा गमवावा लागणार.<br /><br />जाणकार म्हणतात की हे प्रकरण तसे दोन वर्षांपासून तपासात आहे. रेंजल ह्यांना शिक्षा कमी करवून घेण्याची व तडजोड करण्याची मुभा आहे, पण त्यांनी ती अजून वापरलेली नसून ते पब्लिक ट्रायल साठी तयार होत आहेत.<br /><br />हे प्रकरण वाचताना आपल्याकडच्या आरोपांची हमखास आठवण येते. मुळात आपले राजकारणी साळसूदपणे कागदपत्रे हाती लागणार नाहीत ह्याची छान काळजी घेतात . शिवाय कॉलेजेस काढणे हे आपल्याकडे आपण राजकारण्यांसाठीच सोडलेले कुरण असल्याने आपल्याला त्यात गैर वाटतच नाही. आणि आपल्याकडे कोणता राजकारणी सार्वजनिक खटल्यासाठी तयार होईल ? <br /><br />अमेरिका भले आपल्या राजकारण्यांच्या नीतीचा रंग इथे दाखवत आहे, पण त्यांना शिकायचे असेल तर त्यांना भारतात रगेलांची नीती अगदी स्पष्ट दिसायला मिळेल !<br /><br />अरुण अनंत भालेराव<br />arunbhalerao67@gmail.com<br /><br /><br />Naradaachi Kal---6<br /><br />No Angels in Politics, only Rangels<br /><br />Presently the veteran Congressman of 80 yrs, Mr.Rengel is making news in America. Ethics Committee formed with 4 members each of Democrats & Republicans is investigating charges against him of impropriety and has formally charged him of wrongdoings on 13 counts. This mainly involves solciting huge donations for a college being set up in his name in New York and misusing his office.<br /><br />This is an embarassment for everybody as Mr.Rangel has been representing Harlem,New York since last 50 yrs in Congress and is due for re-elections in Nov.2010. If a strict punishment is handed to him, it will take away the support of blacks for democrats and if no action is taken against him then Republicans turn holier than thou !<br /><br />This Rangel episode brings memories of Indian Politicians to our mind. At least credit would have to be given to Indian Roughe politicians that they generally do not leave any paper trails and of course unlike Mr.Rangel they would never face a public trial let alone any Congressional enquiry.<br /><br />America perhaps can learn a lesson or two from Indian Politicians with their dictum that in politics there are no Angels but only Rangels !<br /><br />Arun Anant Bhalerao<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-9135913147722322010-07-01T21:42:00.000-07:002010-07-01T21:43:14.234-07:00नारदाची कळ-५<br />पवारफुल क्रिकेट<br />आय सी सी आय चे माल्कम स्पीड ह्यांनी आरोप केलाय की पवारांना अध्यक्ष झाल्यावर पूर्ण वेळ मिळणार नाही. कारण ते भारताचे कृषी मंत्री आहेत व १२० कोटी लोकांच्या अन्नधान्न्याची व्यवस्था करण्यापासून त्यांना फुरसत मिळणार नाही. आता आपल्याला माहीत आहे की कृषीमंत्री काही पूर्णवेळ काम करणारे नसतात. आपल्याकडे पाऊसच दोन तीन वर्षांतून एकदा पडतो, शेतकरी इतके गरीब असतात की क्वचितच शेती करू शकतात, शिवाय ती परवडतही नाही. त्यामुळे हा आरोप जाऊ द्या. पण त्यांनी पुढे असे म्हटलेय की पवारांना क्रिकेट मधले कळत नाही. आता मात्र पवारांना क्रिकेट कळते हे दाखवूनच द्यावे लागेल.सोनी वाल्यांनी ( ह्यात सुप्रियांचे भांडवल आहे ) एक कार्यक्रमच ठेवला, "कळतच नकळत कळते ". ह्यातील काही सवाल-जवाब :<br />सोनी : एकाच वेळी दोन फलंदाज रन-आऊट होऊ शकतात का ?<br />पवार : कसे शक्य आहे ? आमची परंपराच आहे की एका वेळेस एकच जण "आऊट" होऊन बोलू शकतो. जसे: मी म्हणालो की शेती परवडत नाही, शेतकर्यांनी ती सोडून द्यावी की लगेच मॅडमकडून पॅकेजेस येतात. आमचे संपादक म्हणाले की साखरेचे भाव वाढले हे चांगलेच आहे कारण कमी साखर खाल्ल्याने मधुमेह होणार नाही, तर मग मी त्यांना कार्ल्याचा रस प्यायला लावतो.माझ्यावर काही आरोप झाले तर पटेलांना क्लीन चिट् मिळते.किंवा सुप्रियाला.<br />सोनी : एकदा "रिटायर्ड हर्ट" झालेला फलंदाज परत खेळू शकतो का?<br />पवार : का नाही ? मी स्वत: किती वेळा तरी परत खेळायला आलेलो आहे. आता आय पी एलचेच पहा. तिकडे भानगडी निघाल्या तरीही इकडे आयसी्सी चे जमलेच की ! आठच एमपी आले तरी दोघा तिघांना घबाड मिळालेच की. कधी मुख्य, कधी संरक्शण, कधी विरोधी, तर कधी कृषी मंत्री ! आता तर लोक म्हणायला लागलेत की क्रिकेटला दुसरे नाव ठेवा : प्वार-खेळ ! खरा अर्थ घ्या : पवार-खेळ ( विरोधक म्हणतील, पोर-खेळ , तर ते खरे नाही !)<br />सोनी : "फॉलो ऑन" म्हणजे काय ?<br />पवार : हा आमचा आदेश आहे. सगळ्या सग्या सोयर्यांना व जणतेला. आमच्या मागे या, कारण यातच आमचे भले आहे !<br />अरर बदलला का चॅनल !<br /><br />-----अरुण अनंत भालेराव<br />९३२४६८२७९२<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-31765333023766438032010-06-08T02:29:00.001-07:002010-06-08T02:29:33.955-07:00नारदाची कळ-४<br />लप फायनान्स, लपा लपा, लपलप !<br />कोणीही उठावे व शरद पवारांना टपली मारून जावे ! आणि कार आश्चर्य, ते खरेच निघते ! आता आयपीएलचेच पहा ! टाईम्सने जनरल वाईड बॉल टाकला की सिटी कॉर्पोरेशन मध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि काय योगायोग लॅप फाइनान्स ह्या कंपनी मार्फत त्यांचा सहभाग आहे हे खरेच निघाले. आता कळते आहे की ही लॅप फाइनान्स कंपनी खरे तर आहे "लप फाइनान्स". लपालपीच्या खेळात आपण जसे लपतो व ज्याच्यावर राज्य असेल तो आपल्याला शोधतो तसे कुठलीही गुंतवणूक लपवायची असेल तर ही "लप फाइनान्स" कंपनी ती गुंतवणूक बेमालूम लपवते. मुळात भारतीय असलेल्या ह्या लपालपीच्या खेळालाच शरद पवारांनी त्याचे नामाभिधान "आय पी एल" करून ( लपालपीचेच हे भाषांतर आहे असे सकाळचे पवार, शरद पवारांना रात्री सांगत असताना खूप जणांनी ऐकले आहे असे कळते !) प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे हे मात्र लोक विसरतात.<br />लपालपा, लपलप, साहेब जात आहेत !<br />-----अरुण अनंत भालेराव<br />९३२४६८२७९२<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-50914468372568300082010-05-21T01:32:00.000-07:002010-05-21T01:33:16.887-07:00नारदाची कळ-३<br />३-जी चे जी जी र जी जी !<br /><br />नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञान म्हणजे जी, प्रथम होते २-जी, आणि आता आले आहे ३-जी ! सरकारची अपेक्षा होती तीस हजार कोटीच्या आसपास. लिलावात मिळाले ६७ हजार कोटी !<br /><br />एवढे पैसे मिळवून देणारे हे मोबाईलचे तंत्रज्ञान देईल इंटरनेट, टी.व्ही., कॉन्फरन्स व्हिडीओ कॉल्स, वगैरे. त्यासाठी हॅंडसेटस वेगळे (महागडे , १६/१७ हजाराचे ) लागतील. आता लोक विचारताहेत की एव्हढे महागडे तंत्रज्ञान आपल्याला परवडणार आहे का ? आणि हे विचारणारे आपले लोक आधीच मर्सीडीज, बीएमडब्ल्यू , ऑडी अशा प्रचंड महागड्या गाड्या घेऊन बसले आहेत.<br />हे आहे प्रचंड किंमतीच्या भूखंडांसारखे ! बिल्डरांना जसे कितीही महागडा प्लॉट परवडतोच ( कारण त्यावर फ्लॅटस् बांधून ते आपल्याकडनंच पैसे घेणार असतात ). कितीही किंमत कशी परवडते ? कारण कारपेट, बिल्ट अप, सुपर बिल्ट अप, असा घोळ कोणी मोजत बसत नाही . तसेच असते मोबाईलचे !<br /><br />जी कंपनी मोबाईलचे बिलिंग करते त्यांना ते कोष्टकच लिहून देतात की १ मिनिट म्हणजे ४३ सेकंद ! आणि आता तर त्यांनी आपल्या गळी दर सेकंदा वर बिलिंग करण्याचे उतरवले आहे. आता आपण आपला सेकंद व त्यांचा सेकंद पडताळून पाहणार आहोत का ? व कसे ?<br /><br />तुम्हाला हे कपोल कल्पित वाटत असेल तर इंटरनेट सेवा पुरवणार्या एम् टी एन एल च्या बिलिंग सेवेला भेट द्या. ते म्हणतात तुम्ही नुसते साइटवर गेलात तरी ते "डाऊन लोड" धरल्या जाते, अनलिमिटेड डाऊनलोड म्हणजे केंव्हांही डाऊनलोड, असे सर्रास लूटमारीचे कोष्टक ! असेच आहे टोल चे ! किती टोल वसूल झाला व किती खर्च झाला होता ह्याचा हिशोबच नसतो. आपण तर ते विचारीतही नाही. म्हणूनच तर नुसतेच भरभक्कम लिलाव नाही तर "राजा" ला भरपूर मलिदा देणेही परवडते. कारण ते परवडणे आपणच आपल्या खिशातून भरत असणार असतो !<br /><br />-----अरुण अनंत भालेराव<br />९३२४६८२७९२<br />arunbhalerao67@gmail.comthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-61408728659690300482010-04-16T02:49:00.000-07:002010-04-16T02:50:30.393-07:00नारदाची कळ : २<br />क्लीन चीट !<br /> आजकाल सगळेच राजकारणी खेळ-क्षेत्रात का आहेत ?<br />हे सगळे विश्व म्हणजे एक ब्रह्मचैतन्य आहे. आणि चैतन्याचा पाया आहे, क्रीडा. म्हणून ज्यांना चैतन्यमय राहायचे आहे त्यांना कुठलाना कुठला खेळ आवश्यक आहे. अगदी स्वत:च खेळले पाहिजे असे नाही. सहभाग आणि स्वाहम केले तरी चालते. शिवाय नाही तरी राजकारण खेळापासून फार वेगळे नाहीय. जसे: क्रिकेट हा खेळ तर राजकारण हा पोरखेळ !<br /> साहेबांनी मोदींना ( दोन्ही मोदी ) क्लीन चिट का दिली ?<br />हे काय विचारणे झाले ! फारच बुवा तुमचे अज्ञान ! साहेब स्वत:च नाही का क्लीन चीट !<br />----कळलाव्याthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-27010866374987381642010-04-13T22:40:00.000-07:002010-04-13T22:42:33.768-07:00नारदाची कळ<br /> भारतीय वृत्तपत्रे भाषा नीट छापण्याच्या कामात फारच चुका करतात. आता हेच पहा ना ! बिचारे शशी थरूर . यूनो च्या सेक्रेटरी पदासाठी निवडणूक लढलेला हा थोर माणूस.( आता निवडून नाही आला हे यूनोचे कमनशीब.). त्याच्या तिसर्या मैत्रिणी संबंधी सगळे पत्रकार खार खाऊन आहेत. सानिया सारख्या एका सुंदर मुलीचे लग्न होते न होते तोच आता ही कोण सुनंदा पुष्कर आहे तीही लग्न करते आहे. सुंदर मुलींचे कितवे लग्न हा कधी प्रश्नच नसतो. वाईट असते ते त्यांना इतरांनी फितविणे. ह्याच जेलसी-न्यायाने ही घटनाच भारतीय पुरुषांना डिप्रेशन आणणारी. त्यात भारतीय पत्रकारांनी इतकी ढोबळ चूक करावी ! ही सुनंदा पुष्कर आता शशी थरूर ह्यांची मैत्रीण आहे व ते तिसरे लग्न करणार आहेत हे किती चूक आहे. पुष्कर मैत्रिण नसून खर्या बातमीत "पुष्कळ मैत्रिणी आहेत" अशी ओळ होती. त्याची मुद्रणात चूक करीत सुनंदा पुष्कर ही एकच मैत्रीण आहे हा समज पसरविणे हे थरूर साहेबांचे बदनामी करणारेच आहे. आता ते नक्कीच अब्रू-नुकसानीचा दावा ठोकणार पत्रकारांवर. रहा आता तयार किंवा माफीनामा छापा की खूप सुंदर मैत्रिणी आहेत थरूर साहेबांना !<br />-------कळलाव्याthe Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.com0