marathi blog vishva

शनिवार, १६ जुलै, २०११

------------------------------------------------------------------------------------

नारदाची कळ----१८
राहूल गांधी : "सरकार सगळे आतंकवादी हल्ले रोखू शकत नाही, ९९ टक्के रोखू शकते पण १ टक्का हल्ला होऊ शकतो !"
श्रीमती सोनिया गांधी ह्या राहूल गांधीच्या जन्मावेळीच्या बाळंतपणात जरा अवघडल्या होत्या. एका व्हायरसने त्या खूपच आजारी पडल्या होत्या. त्या दरम्यान आलेल्या तापामुळे बाळ राहूलला इजा होणार होती. ताप जर लवकर कमी झाला नाही तर बाळावर परिणाम होऊन ते मेंटली रिटार्डेड निघण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी सगळ्या देशोदेशीच्या तज्ज्ञांना बोलावले होते. एका इटालियन डॉक्टरकडे एक औषध होते खरे, पण अजून त्याच्या सर्व तपासण्या झालेल्या नव्हत्या. औषधाला अजून मंजूरी मिळालेली नव्हती . पण दुसरा काहीच इलाज नव्हता . बरीच खलबते झाली. शेवटी श्रीमती सोनिया गांधींना पूर्ण कल्पना देऊन ते औषध द्यावे असे ठरले. त्यांनी विचारले ह्यात धोका काय आहे ? डॉक्टर सांगू लागले ९९ टक्के केसेस मध्ये मेंटल रिटार्डेशन रोखण्यात यश येऊ शकेल, फक्त एक टक्का केस मध्ये....सोनिया गांधींना इतके दुखत होते की त्या म्हणाल्या...हरकत नाही...द्या एकदाचे लवकर...आणि यथावकाश त्या बाळंत झाल्या . बाकी सर्व ठीक होते पण बाळाची बुद्धीची वाढ होत नव्हती. त्यावर सोनिया ( व राजीव व इंदिरा ) म्हणाल्या काही हरकत नाही....ह्या १ टक्केवाल्याला मी भारतात वाढवीन व पायलट नाही तर नाही, पंतप्रधान तरी करीनच !
हा किस्सा ऐकल्यावर लगेच मनमोहनसिंगांची इतिहासकार मुलगी शोध घेऊ लागली की मनमोहनसिंग ह्यांचा जन्म कुठे झाला होता, डॉक्टर कोण होते, व ते औषध दिले होते का ?

---------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा