marathi blog vishva

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ----११
जगतगुरू कोंड देव !
जरा विचार करून पहाल तर इतिहास-तज्ज्ञाशिवाय तुम्हाला पटेल की दादोजी कोंड देव हे शिवाजीचेच काय सगळ्या जगाचेच गुरू आहेत. जगतगुरू !
संभाजी ब्रिगेड पासूनच बघा. ह्यांच्या निडर कार्यकर्त्यांनी मागे जे भांडारकर संस्थेत घुसून शौर्य दाखविले त्याचे खरे श्रेय व प्रेरणा कोणाची ? तर आब दवडणार्‍या आबांची ! राष्ट्रवादीची. कशी ? इतर कोणत्याही सरकारने ह्यांना कोंडले असते तुरुंगात. पण ह्यांचेच कोंड देव ( इतने बडे शहर मे ऐसे हादसे अक्सर होते रहते है--फेम ! ) ह्यांच्याकडे कानाडोळा करते झाले. म्हणजे गुरू झाले कोंडदेव, व तेही दादागिरी करणारे दादोजी !
यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती निमित्त पवार साहेबांनी एक फार मौलिक निरिक्षण नोंदवले की एवढे आयुष्य काढून यशवंतरावांची वैयक्तिक मालमत्ता किती ? तर अवघी, एक दोन लाखाची. जे पवार साहेब म्हणाले नाहीत ते "आणि माझी ?" ते आपण म्हटले तर ? ह्यांच्याही सर्व प्रगतीचे श्रेय कोणाला ? तर कोंड देवांना ! म्हणजे कोण ? तर कुटुंबाची माया, प्रकृती, ह्यांना कोंडते ! शेती परवडत नाही, कर्ज माफी देऊ नये, कांदा अजून महागणार, परदेशात शेती करा असे असंख्य उदगार जे तोंड काढते त्यालाच कोंडणारा हा कोंडदेव रोग ! दर महिन्या दोन महिन्यातून त्याला डागण्या मिळतात !
कुटुंबाची माया ही फार मोठी कोंडणारी देवता आहे. अशोक चव्हाणांना विचारा ! बाकीचे सर्व पचले आणि नेमके नातेवाईकांच्याच आदर्श घरांनी घरघर लावली. इतके करूनही वखवख थांबत नाही. ही थांबवायला एकच देव समर्थ आहे व तो म्हणजे कोंड देव ! त्याला शिवाजी पासून कापून काढला तर आता तो कोणाला का सोडील ?
सर्व विश्व हे एक खेळाचे मैदान आहे व सर्व पैसा-अडका हा एक पोरखेळ आहे असे वाटणार्‍या वैमानिकाचे मनसुबे हवेत झेप घेत असतात. त्याला एकमेव भेव आहे ते कोंडण्याचे, कोंड देवाचे ! तरच तो जमीनीवर येणार !
क्षणात ब्रिगेड बनणारी जात लगेच मागासलेली बनून आरक्षण मागू पाहते, सत्ता काबीज करण्यासाठी इटालियन व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणत म्हणत शेवटी त्यांच्यासमोरच कण्हत कण्हत उभी राहते आणि ह्या सगळ्या नाट्याला भूलून जर जनता ह्यांनाच निवडून देत असेल तर जनतेलाही असेच कोंड देव लखलाभ होतील ! जय जगतगुरू कोंड देव !

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ-----९
सोपी लिकिते !
विकी-लीक्स ने इतके भंडाऊन टाकले आहे की आता "गुपिते"ला पर्यायी शब्दच झाला आहे : "लिकिते" !. मराठीत र्‍हस्व दीर्घाची भानगड ह्या शब्दाला लागू होत नाही. म्हणजे कोणी र्‍हस्व लि व कि वापरले व लिहिले "लिकिते" तर इंग्रजीतले टू लिक म्हणजे चाटणे हा अर्थ धरून हे कोणाचे चाटण आहे ते लोकांनी पहावे. व जर ली व की दीर्घ काढली तर नैतिकता कोणाची लीक होते आहे ते पहावे. आता इतके लीक्स होऊन होऊन सगळा माहोल इतका दल-दलीत झाला आहे की सरळ साध्या गोष्टी आता "सोपी लिकिते" ह्या नावाने प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकी काही वानगी दाखल पहा:
१) राहूल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदू दहशतवाद हा भारताला ज्यास्त धोकादायक आहे का, ह्याची पाहणी सीबीआय ने केली. त्यात त्यांना आढळले: हिंदू दहशतवादी हे फारच बेभरवशाचे आहेत. ते उग्र आंदोलने करतील असे वाटते पण तेव्हा ते करीत नाहीत. राम मंदीर बनवायचे म्हणतात पण बनवत नाहीत. कित्येक ठिकाणी ह्यांचे बॉम्ब फुसके निघतात, फुटतच नाहीत. हे निरनिराळे प्लॅन्सही योजून रद्द करतात. आरएसएस च्या प्रमुखांना मारणार म्हणतात पण कोणीच मारीत नाहीत. आजकाल तर ह्यांच्या संघटना कमालीच्या विचित्र झाल्या आहेत. उदा: गुजरातेत ह्यांच्या पार्टीत मुसलमान निवडून येतात तर हे पार्टीचा प्रवक्ताच मुसलमान ठेवतात. मालेगावच्या प्रकरणातही आढळते आहे की ह्यांनी स्फोटके मुसलमानांकरवी ठेवली. असे जर वाढू लागले तर पुढे चालून भगवा व हिरवा दहशतवाद ओळखू न आल्याने सीबीआयला रंगांधळे व्हावे लागेल.
२) वरील बाबीचा धसका घेऊन सरकारने हिंदूंच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता एक कमिशन नेमले आहे. निवृत्त न्यायाधीश मोहमद रचसा ( हे गृहस्थ "साचर" च्या अगदी विरुद्ध आहेत हा निव्वळ योगायोग समजावा !) सध्या पाहणी करीत आहेत. त्यांचे काही निष्कर्ष : हिंदूंना कधीही आरक्षण नव्हते. त्यामुळे त्यांना सर्वत्र स्पर्धेला तोंड देऊन जगत राहावे लागले. त्यात ते सारखे यशस्वीच होत राहिले. त्याची मुसलमानांना खूप असूया वाटते. तर हा असमतोल घालवण्यासाठी शासकीय नोकर्‍यात हिंदूंना मुसलमानांसारखेच १५ टक्के आरक्षण द्यावे. म्हणजे ते थोडे तरी सुखावतील व आळशी होतील. तसेच सीबीआय च्या पाहणीनुसार सध्या गुन्हेगारात ४० टक्के मुसलमान आढळतात व हिंदू केवळ १० टक्के. तर हाही असमतोल घालवण्यासाठी हिंदूंना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. विशेषत: मोठ्या गुन्हयासाठी. जसे पार्लमेंटवर, मुंबईवर हल्ला करणे. फार तर ह्यात आझमगढी मुसलमान बंधू त्यांचे प्रशिक्षण करू शकतील. त्यांना फाशी-माफी देण्याचा सरकारही विचार करील.
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ---१०

ई-टाली एका हातानेच वाजते !
टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !
बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !
ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !
जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्‍यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !
arunbhalerao67@gmail.com
नारदाची कळ---१०
ई-टाली एका हातानेच वाजते !
टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !
बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !
ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !
जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्‍यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !
arunbhalerao67@gmail.com